छत्रपती शिवरायांच्या पादुका विठ्ठलाच्या दर्शनाला; 22 दिवस पायी चालत गाठले पंढरपूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी | रायगड किल्ल्यावरुन निघालेली छत्रपती शिवरायांची पालखी आज श्री विठ्ठल दर्शनासाठी मंदिरात दाखल झालीय. रायगडावरुन २२ दिवस पायी चालत या पालखीने पंढरपूर गाठले. या पालखीचे हे सातवे वर्ष आहे. भक्ती सोहळ्यामध्ये हा शक्तीचा सोहळा यांचा संगम झालाय. विशेष म्हणजे या पालखीला शासनाने कोणतीही परवानगी दिली नव्हती. मात्र छत्रपतींच्या गनीमी काव्याने हे पाच मावळे पंढरपूरात दाखल झाले आहेत.

दरम्यान सर्व संतांच्या पालख्या आज परतीच्या वाटणे निघाल्या आहेत. गेल्या 2 दिवस या पालख्या पंढरपूरातच होत्या. यावेळी आषाढी यात्रेवेळी कोरोनाचे संकट असल्याने या पालख्यांसोबत खूपच कमी वारकरी आले होते. पंढरपुरात ही कोरोनाचा रुग्ण सापडल्याने जास्त वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली नव्हती.

विठ्ठल रुख्मिनीची शासकीय पूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडली. यावेळी खूप कमी भाविकांमध्ये ही पूजा संपन्न झाली. यानंतर मंदिर प्रदक्षिणा करून आज सर्व पालख्या परतीच्या वाटेने निघाल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment