मराठवाडा विद्यापीठाच्या आंदोलनावेळी पोलीस प्रशासन आणि विद्यार्थ्यांमध्ये खडाजंगी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी । देशातील विद्यापीठ ही आंदोलनाची केंद्र का बनलीत याचा विचार करणं सध्या गरजेचं बनलं आहे. दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामीया विद्यापीठात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन विरोध झाल्यानंतर शनिवारी संध्याकाळी चेहरे झाकलेल्या गुंडांकडून जेएनयूमधील विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याची घटना समोर आली.

जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सर्वत्र आंदोलनांनी जोर धरला असताना औरंगाबादमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थांनी मानवी साखळी करीत निषेध रॅली काढली. या निषेध रॅली दरम्यान काही ठिकाणी पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये खडाजंगी झाल्याचं चित्र पहायला मिळालं. विद्यार्थी उद्धट असल्याचा शेरा पोलिसांनी मारला तर विद्यार्थ्यांकडून संघ आणि भाजपच्या लोकांना टार्गेट करण्यात आलं.

यावेळी हजारहून अधिक विद्यार्थी रॅलीमध्ये सहभागी झाले होते. जेएनयूमधील घटनेचा निषेध करत असताना, आवाज दो – हम एक हैं, जयभीम, मोदी सरकार मुर्दाबाद, अभाविप आणि आरएसएसचा विरोध असो अशा घोषणा यावेळी विद्यार्थ्यांनी दिल्या. दरम्यान महाराष्ट्रात ठिकठिकाणी या घटनेचे पडसाद उमटत असून विद्यार्थ्यांचे मोर्चे निघाल्याचंही पहायला मिळालं.

Leave a Comment