गाईच्या शेणावर संशोधन करा; केंद्रीय मंत्री गिरीराजसिंह यांचे वैज्ञानिकांना आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते गिरीराज सिंह यांनी वैज्ञानिकांना शेणा विषयी अधिक संशोधन करण्याचे आवाहन केले. यामुळे शेतकऱ्यांनी दुधाचे उत्पादन बंद केल्यावरही गायी पाळणे आर्थिकदृष्ट्या त्यांना परवडेल. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या फायदा होईल असे त्यांनी सांगितले. 12 राज्यांतील कुलगुरू आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत ते बोलत होते.

गिरीराज सिंह यांनी सोमवारी सांगितले की, “उत्तर प्रदेशात भटकी जनावरे ही मोठी समस्या आहे. जर शेतकरी शेण आणि मूत्रातून पैसे कमवू शकतील तर ते आपली गुरेढोरे सोडणार नाहीत.

केंद्रीय मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धशाळेचे मंत्री असलेले गिरीराज सिंह म्हणाले, “गायीच्या दुधावर, शेणामध्ये आणि मूत्रातही मूल्यवर्धित होण्यासाठी अफाट वाव आहे.
ते म्हणाले, जर शेतीचा खर्च कमी झाला तर गाव आणि शेतकरी प्रगती करतील.

भाजप नेते पुढे म्हणाले की, त्यांनी महात्मा गांधी, राम मनोहर लोहिया आणि दीनदयाल उपाध्याय यांच्या आदर्शांचे अनुसरण केले. गिरीराज सिंह म्हणाले, “जसे लोक गीता, कुराण आणि रामायण शिकवतात त्याचप्रमाणे मी गांधी, लोहिया आणि दीनदयाल उपाध्याय यांच्या आदर्शांचा अभ्यास करतो.”

Leave a Comment