२४ तासात महाराष्ट्रात कोरोनामुळे सर्वाधिक १२३ मृत्यूंची नोंद 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहेच पण आज गेल्या २४ तासात राज्यात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यूची नोंदही झाली आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत मात्र तेवढेच रुग्ण बरेही होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र आज राज्यात १२३ हा सर्वाधिक मृत्यूचा आकडा पाहण्यात आला आहे. ही माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने आज जाहीर केली आहे. शासन विविध स्तरावर उपाययोजना करीत आहे.

दरम्यान आज राज्यभरात एकूण २९३३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ७७ हजार ७९३ इतक्यावर पोहोचली आहे. राज्यातील एकूण मृतांची संख्या २७१० इतकी झालीय हे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

 

देशात आज एकूण ९ हजार ३०४ रुग्ण वाढले असून एकूण संख्या २ लाख १६ हजार ९१९ वर पोहोचली आहे. देशात आज ६ हजार ७५ मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत देशात एकूण १ लाख चार हजार १०६ लोक बरे झाले आहेत. देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक असून ते ४८% इतके आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment