नाभिक संघटनेच्या ‘या’ निर्णयामुळे; राजकीय नेते, अधिकाऱ्यांची होणार पंचाईत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्य अनलॉक होत असताना अन्य व्यवसायांप्रमाणेच सलून व्यवसाय सुद्धा सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी रत्नागिरी जिल्हा नाभिक समाज संघटनेने शासनाला केली आहे. तसेच नाभिक समाजाच्या प्रत्येक कुटुंबाच्या खात्यात प्रत्येकी १५ हजार रुपये जमा करावेत, यासोबत सलून व्यावसायिकांना ५० लाखांचे विभा संरक्षण देण्यात यावे, आदी मागण्या करतानाच जोपर्यंत या मागण्यापूर्ण होत नाहीत, तोपर्यंत राज्यातील कोणत्याही नेत्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या दाढी-कटींग करणार नाही, असा संतप्त इशाराच नाभिक समाज संघटनेने दिला आहे.

याचसोबत उद्यापासून राज्यात ‘हत्यारबंद आंदोलना’ची हाकही या संघटनेने दिली आहे.लॉकडाऊनमुळे सलून चालक, मालक आणि कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशात राज्य अनलॉक होत असताना सलून व्यवसायाला सुरु करण्याची अजूनही परवानगी शासनाकडून मिळाली नाही आहे. करोना लॉकडाऊनच्या काळात रत्नागिरी जिल्ह्यासह महाराष्ट्रातील तमाम सलून चालक, मालक, कारागिरांनी शासनास सहकार्य करून आपली दुकाने बंद ठेवली. पण शासनाने नाभिक समाजाकडे दुर्लक्ष केले व सलून दुकाने उघडण्यास आजही परवानगी नाकारली आहे.

आमच्याकडे उदरनिर्वाहसाठी पारंपारिक नाभिक व्यवसायाशिवाय इतर साधन नाही. ९०% लोकांकडे शेती नाही, दुकानेही भाडेपट्ट्याने घेतली आहेत. त्यामुळे भाडे, वीजबील, कर्ज, घरचा खर्च, औषधांचा खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च इतर उधार उसनवारी आदी खर्च कसा करायचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी कैफियत नाभिक संघटेननेतील सलून व्यावसायिकांनी बोलून दाखवली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment