सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण: सुप्रीम कोर्टाच्या निकालावर मुंबई पोलीस आयुक्त म्हणाले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । अभिनेता सुशांतसिंह राजपूत (sushant singh rajput) मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालायने दिला. या प्रकरणातील सर्व पुरावे सीबीआयला सोपवण्याचे व तपासात सहकार्य करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत.

“सर्वोच्च न्यायालयाची आदेश प्रत मिळाल्यानंतर आम्ही त्याचा अभ्यास करु. त्यानंतर पुढे काय करायचे त्याचा निर्णय घेऊ. आदेशाची प्रत पाठवण्यासंदर्भात आम्ही सर्वोच्च न्यायालयातील आमच्या वकिलांशी चर्चा केली आहे” असे मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह म्हणाले.

दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयाने आजच्या सुनावणीत बिहार सरकारने दाखल केलेली एफआयआर योग्य असून बिहार सरकारला तपासाचा अधिकार असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. शिवाय बिहार पोलिसांचा अर्ज वैध असल्याचं सर्वाच्च न्यायालयानं सांगितलं आहे. या सर्व प्रकरणात मुबंई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारनं सहकार्य करावं, तसंच सर्वोच्च न्यायालयाकडून केस फाईल सीबीआयकडे देण्याचे आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत.सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने निर्णयाविरोधात दाद मागण्यासंबंधी विचारणा केली. मात्र कोर्टाने त्यासाठी नकार दिला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment