अमरावतीत धरणात बुडून दोन बहिणींचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील पथ्रोट नजीकच्या गोंडवाघोली गावाला लागुन असलेल्या भुलेश्वरी धरणात दोन सख्या बहीणींचा बुडून मृृत्यु झाल्याची दुर्देवी घटना घडली. कुणबी वाघोली येथील रश्मीता राजेश बेलसरे वय १० वर्षे व कावेरी राजेश बेलसरे वय ८ वर्षे अशी सदर बहिणींची नावे आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार, दोघी बहीणी व दोन मावस बहीणी खेळत खेळत धरणा वर पोहचल्या. तिथे पाण्यात उतरुन आंघोळ करत असताना खोल पाण्यात पाय घसरुन पडल्याने दोघी बहिणींचा पाण्यात बुडुन मृृृृत्यु झाला. बाकी दोघी मात्र सुखरूप बचावल्या. सदर विद्यार्थीनी जि.प शाळा गोंडवाघोली शाळेच्या असल्याची माहीती आहे.

पोलिसांनी दोनही मृतदेह धरणांतून काढून शवविच्छेदना करिता ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे. पुढील तपास पथ्रोट चे एपी आय खेडेकर सह पथ्रोट पोलीस करत आहेत. मात्र या दुर्देवी घटनेनेने पथ्रोट येथे हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment