अमोल कोल्हेंनी केली राज्य सरकारवर सडकून टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी |शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी राज्यातील फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे. दुष्काळाचा प्रश्न हाताळण्यात फडणवीस सरकार अपयशी ठरले आहे. दुष्काळाची भीषणता जेवढी आये तेवढ्या प्रमाणात सरकार जर दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावून गेले असते तर आज बऱ्याच समस्या सुटल्या असत्या असे अमोल कोल्हे यांनी म्हणले आहे.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उभारलेल्या पुरोगामी शिल्पाच्या उद्घाटन प्रसंगी अमोल कोल्हे बोलत होते. या  कार्यक्रमानंतर अमोल कोल्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  पुरोगामी शिल्प  उभारल्या बद्दल अमोल कोल्हे यांनी जितेंद्र आव्हाड यांचे अभिनंदन केले. त्याच प्रमाणे यावेळी  पुरोगामी शिल्पा विषयी बारकावे देखील समजून सांगितले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने दुष्काळ निवारणासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. त्याच प्रमाणे चारा छावण्यांना चारां पुरवण्याचे आणि पाण्याचे टँकर पुरवण्याचे काम देखील केले जात आहे असे अमोल कोल्हे म्हणाले आहेत. अमोल कोल्हे यांनी अत्यंत शेलक्या शब्दात फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

Leave a Comment