पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवणुक करून मिळवा भरपूर नफा; कसे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । सतत घसरणाऱ्या व्याजदरांमध्ये तुम्हाला तुमचे पैसे दुप्पट करायचे असतील तर तुम्ही किसान विकास पत्र (KVP) योजनेत गुंतवणूक करू शकता. या पोस्ट ऑफिस स्कीममध्ये केवळ तुमचे पैसेच सुरक्षितच राहणार नाहीत तर मॅच्युरिटीवर तुम्हाला दुप्पट पैसेही मिळतात, म्हणजे 124 महिने (10 वर्षे 2 महिने). या योजनेसाठी 6.9 टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला आहे.

किसान विकास पत्र ही वन टाईम इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे, जी भारत सरकारद्वारे चालवली जाते. हे प्रामुख्याने शेतकरी आणि कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी आहे, जेणेकरून ते त्यांचे पैसे दीर्घकाळ वाचवू शकतील. यामध्ये मोठ्या रकमेची गुंतवणूक सुरू करणे आवश्यक नाही.

तुम्ही 1000 पासून गुंतवणूक सुरू करू शकता
तुम्ही देशभरातील पोस्ट ऑफिस आणि मोठ्या बँकांद्वारे या योजनेत गुंतवणूक करू शकता. यामध्ये किमान 1,000 रुपयांनी गुंतवणूक सुरू करता येते. जर तुम्ही या योजनेत 50,000 रुपये गुंतवले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एक लाख रुपये मिळतील.

2.5 वर्षांनंतर पैसे काढण्याची सुविधा
किसान विकास पत्र सर्टिफिकेटच्या स्वरूपात उपलब्ध आहे. यामध्ये 1,000, 2,000, 5,000, 10,000 आणि 50,000 रुपयांपर्यंतचे सर्टिफिकेट दिले जाते, ज्याचा व्याजदर जारी करताना निश्चित केला जातो. मात्र, सरकारी नियमांनुसार त्यात बदल होऊ शकतात. KVP मध्ये मॅच्युरिटी कालावधी 124 महिने असला तरी आवश्यक असल्यास तुम्ही 2.5 वर्षांनी पैसे काढू शकता.

‘ही’ कागदपत्रे आवश्यक आहेत
KVP च्या नियमांनुसार, ते अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने प्रौढ व्यक्ती आणि कमकुवत मनाच्या व्यक्तीच्या वतीने पालक खरेदी करू शकतात. KVP खाते उघडण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्ट यासारखे ओळखपत्र आवश्यक आहे.

लॉकइन पिरियडनंतर पैसे काढल्यावर मिळणार रिटर्न
वेळ (वर्षांमध्ये) – रिटर्न (रु. मध्ये)
2.5 वर्षांनंतर आणि 3 वर्षापूर्वी – 1,154
5 वर्षांनंतर आणि 5.5 वर्षापूर्वी – 1,332
7.5 वर्षांनंतर आणि 8 वर्षापूर्वी – 1,537
10 वर्षांनंतर आणि मॅच्युरिटीपूर्वी – 1,774
मॅच्युरिटीवर (12 महिने) – 2,000
(कॅल्क्युलेशन 1,000 रुपयांच्या गुंतवणुकीचे)

जर गरज नसेल तर फक्त मॅच्युरिटीवरच पैसे काढा
गुंतवणूक सल्लागार स्वीटी मनोज जैन सांगतात की,”ही भारत सरकारची योजना आहे. त्यामुळे यामध्ये गुंतवणूक करताना कोणताही धोका नाही. तसेच मॅच्युरिटीवर पैसे दुप्पट होतात. जर तुम्हाला 124 महिन्यांपूर्वी हवे असेल तर तुम्ही अडीच वर्षानंतरही पैसे काढू शकता. अशा स्थितीत तुम्हाला कमी व्याज मिळते. त्यामुळे जर गरज नसेल तर केवळ मॅच्युरिटीवरच पैसे काढा.

Leave a Comment