ग्राहकांसह किरकोळ व्यापाऱ्यांवर बाजार समिती करणार कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद । जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किरकोळ व्यापाऱ्यांना व्यवहार करण्यासाठी पायबंद करण्यात आला आहे. नसता बाजार समिती या किरकोळ व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा निर्णय आज बाजार समितीमध्ये सभापती राधाकिसन पठाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

शहरामध्ये कोरोना हा आजार झपाट्याने वाढत असून दिवसेंदिवस कोरोणा रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला खरेदी करण्यासाठी किरकोळ व्यापाऱ्यांसह ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहेत. त्यामुळे या ठिकाणी किरकोळ व्यापाऱ्यांना बाजार समितीच्या आवारामध्ये भाजीपाला विक्री करण्यास पाय बंद करण्यात आला आहे, जे व्यापारी या ठिकाणी भाजी विक्री करतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच भाजीपाला खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांवर ही कारवाई करण्यात येणार आहेत.

किरकोळ व्यापाऱ्यांना शहरातील 9 झोनमध्ये 41 ठिकाणी भाजीपाला विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्याच ठिकाणी किरकोळ व्यापाऱ्यांना भाजीपाला विक्री करता येईल, तसेच हातगाडीवाल्यांना गल्लोगल्ली जाऊन भाजीपाला विक्री करावा आणि कोरोनाला पायबंद कसा बसेल यासाठी जनजागृती करावी, असा निर्णय बाजार समितीच्या सभागृहामध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment