Saturday, March 25, 2023

राजीनाम्याच्या चर्चांवर अनिल देशमुख यांनी महत्त्वाचे ट्विट ; म्हणाले की….

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि मुकेश अंबानी यांच्या घरासमोर ठेवलेली स्फोटक यामुळे ठाकरे सरकारच्या अडचणी वाढल्या असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. देशमुख राजीनामा देणार अशा बातम्याही चर्चेत आल्या. मात्र आता खुद्द अनिल देशमुख यांनी ट्विट करत यावर पडदा टाकला.

याबाबत केलेल्या ट्विटमध्ये अनिल देशमुख म्हणाले की, आज मी विदर्भातील महत्वपूर्ण अशा मिहान प्रकल्पासंदर्भात चर्चा करण्यासाठी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमध्ये मागील दोन दिवसांत मनसुख हिरेन आणि सचिन वाझे प्रकरणाविषयी एटीएस आणि एनआयएने केलेल्या तपासाची चर्चाही झाली. दरम्यान इलेक्ट्रॉनिक मीडियावर माझ्या राजीनाम्याच्या ज्या बातम्या दाखवण्यात आल्या,त्यात कोणतेही तथ्य नाही, असेही अनिल देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले.

- Advertisement -

दरम्यान मनसुख हिरेन प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राज्य सरकार वर नाराज झाले होते. दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि शरद पवार यांच्यामध्ये सुमारे तासभर खलबतं सुरू होती. त्यामुळे देशमुख यांचा राजीनामा घेतला जाईल अशा चर्चा रंगल्या होत्या.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group