सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर चीनने भारतापुढे ठेवला ‘हा’ प्रस्ताव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । लडाख सीमा वादावरून ताणलेले संबंध सुधरवण्यासाठी चीनने भारतासमोर आणखी एक प्रस्ताव दिला आहे. आर्थिक विकासासाठी भारताने चीनच्या ‘बेल्ट ऍण्ड रोड इनिशिएटीव’ (बीआरआय) प्रकल्पात सहभागी व्हावे असे चीनला वाटत आहे. भारतासाठी हा प्रस्ताव महत्त्वाचा ठरणार असून आर्थिक विकासाच्या संधी त्यांच्यासाठी उपलब्ध होणार असल्याचे चीनने म्हटले आहे.

चीन सरकारच्या ‘ग्लोबल टाइम्स’मध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात भारताला ‘बीआरआय’चा प्रस्ताव देण्यात आला आहे. चीनच्या प्रस्तावित बीआरआय प्रकल्पामुळे भारताच्या आर्थिक विकासाला हातभार लागू शकतो. बीआरआय प्रकल्पाचा उद्देश्य देश आणि संबंधित क्षेत्राच्या विकास करणे आहे. पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीतून बीआरआय प्रकल्पातून भारताला फार मोठी संधी मिळणार असून परदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी आणि औद्योगिक विकासासाठी ही गुंतवणूक महत्त्वाची असल्याचे चीनने म्हटले आहे.

भारताच्या अर्थव्यवस्थेत मागील काही वर्षात वेगाने वाढ होत आहे. मात्र, पायाभूत सुविधा फारशा विकसित नसल्यामुळे विकासात अडचणी निर्माण होत असल्याचे चीनने म्हटले आहे. भारताने १९९१ पासून आर्थिक सुधारणा केल्या असल्या तरी आर्थिक संकट, व्यापार नुकसान, महागाईचे संकट आहे. भारताने बीआरआयमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर या समस्या सुटणार असल्याचा दावा चीनने केला आहे. करोनाच्या संकटानंतर सगळेच देश आर्थिक विकासासाठी प्रयत्न करणार आहेत. हिंदी महासागर आणि आजूबाजूचा परिसर बीआरआयसाठी उपयुक्त असल्याचे चीनने म्हटले आहे.

याआधी भारताने चीनचा ‘तो’ प्रस्ताव फेटाळला
भारताने याआधीच बीआरआय प्रकल्पात सहभागी होण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. चीनचा हा प्रकल्प भारताच्या सार्वभौमत्वाला धक्का असल्याची भूमिका भारताने मांडली आहे. चीनने पाकिस्तानसह इकॉनॉमिक कॉरिडोअर प्रकल्प सुरू केला असून भारताने त्याला विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पातील मार्ग पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तानमधून जातो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment