घटनेतील देशाचे नाव ‘इंडिया’ बदलून ‘भारत’ करण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । इंडिया हे देशाचे नाव बदलून भारत असे ठेवण्यात यावे अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. या याचिकेची प्रत संबंधित मंत्रालयाला पाठवावी, संबंधित मंत्रालय त्यावर निर्णय घेईल, असे कोर्टाने म्हटले आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम १ मध्ये नमूद असलेले देशाचे ‘इंडिया’ हे नाव बदलून फक्त ‘भारत’ इतकेच ठेवण्याबाबत या याचिकेत याचिकाकर्त्यांनं म्हटलं होत. मात्र, सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून याचिकाकर्त्यांला दणका दिला आहे.

भारतीय राज्यघटनेत बदल करून आणि इंडिया हा शब्द काढून टाकून त्याजागी हिंदुस्तान किंवा भारत असे करण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले जावेत, असे सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते. राज्यघटनेत भारत हा शब्द जोडणे आपल्या राष्ट्रीयतेसाठी आवश्यक असल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले होते. इंडिया हे नाव राज्यघटनेच्या कलम १ अंतर्गतच येते. त्यात इंडिया नावाऐवजी भारत किंवा हिंदुस्थान असे नमूद करण्यात यावे असे याचिकेत म्हटले आहे.

राज्यघटनेत कलम १ मध्ये इंडिया या शब्दाचा उल्लेख असून ब्रिटीशांचे शासन संपुष्टात आल्यानंतर इंडिया हे इंग्रजी नाव बदलून भारत असे ठेवले पाहिजे, असे याचिकेत म्हटले आहे. भारताची ओळख निश्चित करण्यासाठी कलम १ मध्ये बदल केला पाहिजे. त्यासाठी इंडिया हे नाव बदलून भारत असे नाव नोंदवले जावे, अशी याचिकेत मागणी करण्यात आली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment