केंद्र सरकार खोटं बोलत आहे, जनगणनेचा डाटा 2016 पासून केंद्राकडेच पडून; छगन भुजबळांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसी आरक्षणासंदर्भात इम्पिरिकेल डेटा एकत्र करण्यावरून महाविकास आघाडी सरकावर भाजपकडून निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी मोदी सरकावर गंभीर आरोप केला आहे. केंद्र सरकारने संसदीय समितीपुढे जनगणनेचा डाटा 99 टक्के बरोबर असल्याचे सांगितले तर सुप्रीम कोर्टात वेगळी भूमिका मांडली आहे. वास्तविक केंद्र सरकार खोटं बोलत आहे. 2016 पासूनच केंद्राकडे जनगणनेचा रिपोर्ट पडून आहे. मात्र, त्यामध्ये त्रुटी असल्याचे सांगत राज्य सरकारला डाटा देण्यास टाळाटाळ केली जात आहे, असा आरोप भुजबळ यांनी केला आहे.

मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी नुकताच संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ओबीसी आरक्षणाबाबत जनगणनेचा डाटा केंद्र सरकारने २०१६ मध्ये तयार केला आहे. मात्र, तो देण्यास केंद्र सरकारकडून टाळाटाळ केली जात आहे. तर भाजपचे सरचिटणीस राहुल वाघ हे ओबीसी आरक्षणाच्या विरोधात कोर्टात गेले आहेत. भाजपचे लोक आरक्षण मिळू नये म्हणून कोर्टात जात आहेत.

केंद्र सरकारच्या ओबीसी डाटा देत नसल्यामुळे महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण देशातील ओबीसी समाज अडचणीत आलेला आहे. याला सर्वस्वी भाजप नेते जबाबदार आहेत. त्यांच्याकडून जाणीवपूर्वक ओबीसी आरक्षण मिळू नये म्हणून प्रयत्न केले जात आहे, असे भुजबळ यांनी म्हंटले आहे.

Leave a Comment