पंतप्रधान मोदीजी चीनवर सर्जिकल आघात करण्याची ‘ती’ वेळ; जितेंद्र आव्हाडांचा सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत आणि चीन यांच्या लष्करी चर्चा सुरु असतानाच सोमवारी पूर्व लडाखमधील गलवानच्या खोऱ्यात अचानक हिंसक झडप घालण्यात आली. गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री आणि मंगळवारी पहाटे झालेल्या संघर्षांत २० जवान शहीद झाले आहेत. यावरुन देशभरातील नेते आक्रमक झालेयत. झोपाळ्यावर बसून झालं आता चीनकडे ‘लाल आंखे’ करा असा सल्ला राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर चीनच्या भ्याड हल्ल्यावर संताप व्यक्त करत चीनला जशाच तसे उत्तर देण्याची वेळ आली असल्याचे आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. ”चीनने भारताच्या भूमीत घुसून आपल्या तीन सैनिकांना मारलं आहे. अशावेळी चीनला धडा शिकवला पाहिजे. मोदींसोबत संपूर्ण देश आहे. आता मोदींनीही आक्रमक होऊन चीनला धडा शिकवला पाहिजे असे आव्हाड यांनी ट्वीटरवर म्हटलंय. झोपाळ्यावर बसून झालं. आता चीनकडे “लाल आंखे” करून पहायची वेळ आल्याचे” आव्हाड म्हणाले.

दरम्यान, आपल्या आणखी एका ट्विटमध्ये आव्हाड यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्यादरम्यानचा एक फोटो पोस्ट करत आव्हाड यांनी मोदींना चीनवर सुद्धा एल सर्जिकल स्ट्राईक करण्याचे आवाहन केलं. ”शी जिनपिंग भारत दौऱ्यावर आले होते तेव्हा मोदीजींनी चेन्नईतल्या हजारो शाळकरी मुलांना त्याच्या स्वागतासाठी असे खोटे मुखवटे घालायला लावले होते.मोदी जी आता ह्या मुखवट्याच्या आड दडलेल्या हिंस्त्र प्रवृत्तीवर सर्जीकल आघात करा” असं आव्हाड ट्विटमध्ये म्हणाले.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment