नवीन पाणीपुरवठा योजनेची गती मंदावली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – शहराची लोकसंख्या 2050 पर्यंत किती राहील हे गृहीत धरून 1680 कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. मागील वर्षभरापासून काम सुरू असले तरी कामाला अजिबात गती नाही. मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम संथ गतीने सुरू आहे. याची गंभीर दखल पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतली. लवकरच संबंधित अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली जाणार आहे.

जायकवाडी ते नक्षत्रवाडी पर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम प्राधान्याने करणे गरजेचे असताना कंपनी शहरात जलवाहिनी टाकण्याच्या कामात अधिक मग्न आहे. मुख्य जलवाहिनी टाकण्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने परवानगी दिली. भूसंपादन करून देण्याची तयारी देखील या यंत्रणेने दाखवली. परंतु जीव्हीपीआर कंपनीकडून पाईप निर्मितीचे काम रेंगाळले आहे. पाईप तयार होऊन त्याची तपासणी बंधनकारक आहे.

जोपर्यंत सर्व निकषांवर तपासणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत पाईपचा वापर करता येणार नाही. त्याचप्रमाणे शहरात विविध भागात जलकुंभ उभारण्याची कामेही बंद आहेत. कंपनीने मुख्य जलवाहिनी कडे लक्ष द्यावे अशी सूचना वारंवार करूनही काम सुरू नाही. याबाबत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व प्राधिकरणाचे सदस्य सचिव यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक होईल. या बैठकीनंतर कामाला वेग येईल अशी अपेक्षा मनपा प्रशासन अस्तिककुमार पांडे यांनी व्यक्त केली.

Leave a Comment