“बाळासाहेब गेले तेव्हाच शिवसेना संपली, आता उरली ती फक्त पवार- गांधी सेना”; निलेश राणेंचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप नेत्यांवर निशाणा साधला. यानंतर केंद्रीयमंत्री नारायण राणे याचे पुत्र था भाजप नेते निलेश राणे यांनी संजय राईट व राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “बाळासाहेबांचे विचार ऐकल्यावर कळेल सत्ता आणि खुर्ची मिळवायला कोणी व किती लाचारी केली. बाळासाहेब गेले तेव्हाच शिवसेना संपली आता उरली ती फक्त पवार गांधी सेना, अशी टीका राणे यांनी केली आहे.

निलेश राणे यांनी आज त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे याच्या भाषणाचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, कोणी कोणा समोर लोटांगण घातलं हे स्व. बाळासाहेबांना पूर्वीच कळलं होतं, बाळासाहेबांचे विचार ऐकल्यावर कळेल सत्ता आणि खुर्ची मिळवायला कोणी व किती लाचारी केली. बाळासाहेब गेले तेव्हाच शिवसेना संपली आता उरली ती फक्त पवार गांधी सेना,” असे राणे यांनी म्हंटले आहे.

https://twitter.com/meNeeleshNRane/status/1494171868416274435?s=20&t=Admzm8yBbvDSfYIu4EQr5Q

दरम्यान, आज राऊत यांनी सकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजप नेत्यांवरही निशाणा साधला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात पुनर्वसनाच्या नावाखाली राज्यात मोठा घोटाळा झाला आहे, असा आरोपही केला आहे.

Leave a Comment