लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी पतीला सोडून नववधू गेली पळून; पोलिसांनी ‘असा’ केला रॅकेटचा पर्दाफाश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

औरंगाबाद – नववधूला औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद पोलिसांनी अटक केली आहे. शुभांगी शिंदे असे अटक केलेल्या नवरी मुलीचे नाव आहे. काल दुसऱ्याचं एका मुलांसोबत लग्न लावताना त्या मुलीला अंमळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

खुलताबाद तालुक्यातील मावसाळा येथील राजेश प्रकाश लाटे याचा जळगाव येथील शुभांगी प्रभाकर शिंदे हिच्याशी विवाह झाला होता. बबन म्हस्के जळगाव व आशाबाई भोरे यांच्या मध्यस्थीतून हा सोहळा झाला होता. नवरदेवांकडील नातेवाइकांनी मुलीकडील मंडळींना 1 लाख 30 हजार रोख व 70 हजारांचे सोने नवरीच्या अंगावर घातले होते. 29 मार्च रोजी नवरदेव राजेश व नववधू शुभांगी हे दौलताबाद किल्ला पाहण्यासाठी गेले. तेव्हा नवरदेव राजेश यास चकमा देऊन शुभांगी फरार झाली. याप्रकरणी दौलताबाद पोलिसात नववधू शुभांगी शिंदे, पांडुरंग विनायक कदम, सपना साळवे, बाबूराव कदम खिल्लारेंसह सातजणांवर गुन्हा दाखल झाला होता.

मुलाचे लग्न होत नसल्यामुळे त्रस्त असलेल्या कुटुंबाला शोधून दोन ते पाच लाखांत वधू विकणारे रॅकेट राज्यात सक्रिय झाले आहे. मराठवाडा, खान्देशासह गुजरातमध्ये या रॅकेटने वधू विक्री करत कुटुंबांना फसवले. जळगाव शहरातील दोन महिला हे रॅकेट चालवतात. या दोघींनी स्वतःच्याच भाचीचे सहा महिन्यांत सहा वेळा लग्न लावले. अमळनेर येथे त्यांचे बिंग फुटले अन् मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले. रॅकेट चालवणारी टोळी मात्र अजूनही फरार आहे.

Leave a Comment