मिशन ‘थँक्यू’ : भारतीय सैन्य “असे’ मानणार कोरोना योद्ध्यांचे आभार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोना विरुद्धच्या लढाईत जीवाची बाजी लावून आघाडीवर कर्तव्य बजावत असलेले डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि अत्यावश्यक सेवेतील लाखो कर्मचाऱ्यांना कौतुकाची थाप आता खुद्द भारतीय लष्कर देणार आहे. कोरोनाविरोधी लढाईतील या योद्ध्यांचे सैन्याच्या तिन्ही दलांकडून आभार व्यक्त (thank you) केले जाणार आहेत. यात हवाई दलाची विमानं ‘फ्लाय पास्ट’ करणार आहे. समुद्रात नौदलाची लढाऊ जहाजं दिव्यांनी उजळतील आणि देशातील विविध हॉस्पिटल्सवर हेलिकॉप्टर्सद्वारे फुलांचा वर्षावही केला जाणार आहे अशी माहिती भारतीय सैन्याचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी शुक्रवारी दिली होती.

यानुसार उद्या सकाळपासून हा कार्यक्रम सुरू होईल. सर्व प्रमथ लॉकडाऊनमध्ये कर्तव्यावर असताना आणि कोरोनाने मृत्यू झालेल्या पोलिसांच्या स्मरणात दिल्लीसह इतर प्रमुख शहरांमधील पोलीस स्मारकांवर आदरांजली वाहण्यात येईल. त्यानंतर हवाई दलाच्या विमानांकडून ‘फ्लाय पास्ट’ करण्यात येईल. यात हवाई दलाची लढाऊ विमानं आणि मालवाहू विमानं सहभागी होतील. ही विमानं उड्डाणांदरम्यान देशाचा बहुतेक भूभाग व्यापतील. सकाळी १० ते ११ वाजेदरम्यान हवाई दलाची विमानं उड्डाणं घेतील. श्रीनगरपासून ते तिरुवनंतपूरम आणि दिब्रुगढ ते कच्छ दरम्यान देशातील सर्व प्रमुख शहरांवरून ही विमानं जातील. हवाई दलाची हेलिकॉप्टर्स आणि नौदलाची हेलिकॉप्टर्स करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या हॉस्पिटल्सवर पुष्प वर्षाव करतील. जमिनीपासून ५०० मिटर उंचीवरून ही विमानं आणि हेलिकॉप्टर्स उडतील. यामुळे नागरिकांना ती पाहता येतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. करोना रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयांबाहेर लष्कराच्या बॅण्ड करून देशभक्तीच्या गाण्यांची धून वाजवण्यात येईल. डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे लष्कराकडून आभार व्यक्त केला जाईल, असं अधिकारी म्हणाले.

याशिवाय नौदलाची हेलिकॉप्टर्स मुंबई, गोवा, कोची आणि विशाखापट्टणम येथील हॉस्पिटल्सवर पुष्प वर्षाव करतील. सकाळी १० ते १०.३० वाजेदरम्यान हा पुष्प वर्षाव केला जाईल. यानंतर संध्याकाळी ७.३० ते रात्री ११.५९ पर्यंत नौदलाची पाच लढाऊ जहाजं दिव्यांनी लखलखतील. मुंबईत गेट वे ऑफ इंडियाच्या ठिकाणी ही जहाजं दिव्यांनी उजळून निघतील. गोव्यात नौदलाकडून विमानतळाच्या धावपट्टीवर मानवी साखळी बनवून करोनाविरोधी लढाईतील योद्ध्यांचे आभार मानले जातील. नौदलच्या पूर्व कमांडकडून विशाखापट्टणमच्या समुद्र किनाऱ्यावर दोन जहाजं संध्याकाळी ७.३० पासून ते मध्यरात्रीपर्यंत दिव्यांनी उजळून निघतील. यासोबतच तटरक्षक दलाची २४ जहाजं पोरबंदर, ओखा, रत्नागिरी, डहाणू, मुरुड, गोवा, न्यू म्यँगलोर, कावराती, कराइकल, चेन्नई, कृष्णपट्टणम, निझामापट्टणम आणि पोर्ट ब्लेअर अशा दिव्यांनी लखलखतील, अशी माहिती लष्कराचे जनसंपर्क अधिकारी अमन आनंद यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment