२००६ कराची कसोटी जेव्हा अख्तरच्या वेगवान गोलंदाजीला भारतीय फलंदाज घाबरले होते- मोहम्मद आसिफ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २००६ मध्ये पाकिस्तानच्या कराची येथे खेळलेला तिसरा कसोटी सामना पाकिस्तानच्या माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आसिफला आठवला. ज्यामध्ये टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज अष्टपैलू इरफान पठाणने हॅटट्रिक घेतली होती. इतकेच नाही तर या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागनेही धडाकेबाज दुहेरी शतक झळकावले होते. आपल्या संघाने भारताविरुद्धचा तिसरा कसोटी सामना कसा जिंकला याबद्दल आसिफने एक मनोरंजक खुलासा आहे.

या मालिकेतील पहिले दोन सामने मुलतान आणि फैसलाबाद येथे खेळविण्यात आले होते तर तिसरा कसोटी सामना २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान कराचीच्या राष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार होता. पाकिस्तानी शो बर्गर्जमध्ये आसिफ म्हणाला, “जर तुम्हाला आठवत असेल तर २००६ साली भारताची टीम पाकिस्तानात आली होती. त्यांनी खूप जोरदार फलंदाजी केली होती. राहुल द्रविड खूपच धावा करत होता, वीरेंद्र सेहवागनेही मुलतानमध्ये आम्हाला खूप धुवून काढले होते. फैसलाबाद कसोटीत तर दोन्ही संघांनी ६०० धावा केल्या. आम्हाला भारताच्या फलंदाजीच्या खोलीबद्दल चिंता होती. महेंद्रसिंग धोनी त्यावेळी सात किंवा आठ क्रमांकावर फलंदाजी करायचा. “

तिसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात पाकिस्तानचा डाव २४५ धावांवर संपुष्टात आला. आसिफ म्हणाला, “सामना सुरू होताच इरफान पठाणने पहिल्याच षटकात हॅटट्रिक घेतली होती. त्यामुळे आमचे मनोबल ढासळले होते. कामरान अकमलच्या खालच्या क्रमांकावर खेळात शतक झळकावले होते. आम्ही जवळपास २४० धावा केल्या.” पाकिस्तानने दुसर्‍या डावात सात बाद ५९९ धावा केल्या आणि भारताला २६५ धावांवर बाद करून आम्ही तो सामना ३४१ धावांनी जिंकला.

Mohammad Asif opens up on his tainted international career

या माजी वेगवान गोलंदाजानेही सांगितले की,’ या सामन्यादरम्यान त्याचा सहकारी शोएब अख्तरच्या वेगवान चेंडूंनी तर एकदा सचिन तेंडुलकरला इतके घाबरवले की त्याचे वेगवान बाऊन्सर्स पाहून सचिनने आपले डोळेच बंद केले.’

तो म्हणाला, “जेव्हा सामना सुरू झाला तेव्हा मी स्क्वेअर लेगवर उभा होतो आणि शोएब अख्तर सातत्याने वेगाने गोलंदाजी करत होता. दरम्यान, सचिनने त्याच्या दोन बाउन्सरवर आपले डोळेच बंद केले होते. भारतीय संघ तेव्हा बॅकफूटवर होता आणि म्हणून आम्ही पराभवाच्या जबड्यातून विजय खेचून आणला. “

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment