Tuesday, December 9, 2025
Home Blog Page 1683

योगी आदित्यनाथ यांचा मुंबईत रोड शो का? : संजय राऊत

Yogi Adityanath's road show

मुंबई | मुंबईत रोड शो कशासाठी करतायत. आमच्याकडील उद्योग अोरबडून नेणार असेल तर आमचा आक्षेप आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री दावोसमध्ये रोड शो करणार आहेत का? मग योगी आदित्यनाथ मुंबईत रोड शो का करत आहेत?, असा सवाल करतानाच हे राजकारणाचे धंदे सोडून द्या तसेच भारतीय जनता पार्टी पुरस्कृत राजकारण बंद करा, अशा शब्दात संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईत ते अनेक उद्योगपतींशी चर्चा करून उत्तर प्रदेशात गुंतवणूक नेणार आहेत. तसेच ते ताज हॉटेलबाहेर रोडशोही करणार आहेत. त्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांना फटकारले आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री दावोसला जात आहेत. तिथे गुंतवणुकदारांची जागतिक परिषद असते. तिथे जाऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री रोड शो करणार आहेत का? गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी दावोसच्या रस्त्यावर रोड शो होणार आहे का? मग यूपीच्या मुख्यमंत्र्यांना ताजमहल हॉटेल समोर रोड शो करण्याची गरज काय? हे राजकारणाचे धंदे बंद करा, असं संजय राऊत म्हणाले.

आपण आलात तुमचा सन्मान आहे. तुम्ही सन्माने निघून जा. उद्योगपतींशी चर्चा करा. तुमच्याविषयी प्रेम आदर आहे तो राहील. फक्त राजकीय उद्योग करू नका, असं राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांना सुनावले आहे.

Nora Fatehi ला डेट करतोय ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा; अनन्या पांडेचं काय होणार?

Nora And Aaryan Khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये अनेकदा स्टार्सच्या अफेअरच्या बातम्या येत असतात. काही गोष्टी खऱ्या असतात, तर काही खोट्या राहतात. अलीकडेच साऊथ अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये दोघे एकमेकांना किस करताना दिसत होते. हा मुद्दा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. आता आणखी एका जोडीचे काही फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत, ज्याने वादळ निर्माण केले आहे. हे जोडपे दुसरे कोणी नसून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि दिलबर मुलगी नोरा फतेही (Nora Fatehi) आहे. या फोटोवरून दोन्ही स्टार्स एकमेकांना डेट करत असल्याचा अंदाज फॅन्स लावत आहेत.

नोरा-आर्यन खानचे फोटो व्हायरल झाले होते
एका युजरने अलीकडेच दुबईतील पार्टीतील नोराचे (Nora Fatehi) फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये करण जोहर, सुहाना खान आणि आर्यन खान देखील उपस्थित होते. एका चित्रात, नोरा एका महिलेसोबत पोज देत होती, जी नंतर त्याच ड्रेसमध्ये आर्यनसोबत पोज देताना दिसली. ज्यामुळे नोरा आणि किंग खानचे प्रियजन पार्टीमध्ये एकत्र उपस्थित होते. दोघेही एकत्र डिनर करताना दिसले आहेत. मात्र, या गोष्टींना अद्याप कोणीही दुजोरा दिलेला नाही.

अनन्या पांडेसाठी युजर्सची मजा आहे
आर्यन खान आणि नोरा फतेहीच्या (Nora Fatehi) या फोटोंवर चाहते जोरदार कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले, “अरे भाऊ, काय झाले.. आता अनन्या पांडेचे काय होणार, ती एकटी झाली आहे.” आणखी एका युजरने लिहिले, “नोरा की तो निकल पडी… तिने एकदा सांगितले होते की तिला तैमूरशी लग्न करायचे आहे, पण आर्यन खान बरोबर आहे, बरोबर आहे.” दुसर्‍या यूजरने लिहिले, “हे सर्व खरे आहे का भाऊ…बॉलिवुडमध्ये काहीही होऊ शकते”.

आर्यन खान डेब्यू करणार आहे
आर्यन खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. मात्र, तो कॅमेरात न राहता लेखन आणि दिग्दर्शन करणार असल्याचे बोलले जात आहे.या स्टारकिडने अलीकडेच त्याच्या सोशल मीडियावर एक स्क्रिप्ट हातात घेऊन एक फोटो शेअर केला होता ज्यावर त्याचे नाव होते. कॅप्शनमध्ये लिहिले, “लेखनासह गुंडाळले आहे… प्रतीक्षा करू शकत नाही. असे सांगितले जात आहे की आर्यन खानचा हा प्रोजेक्ट एक वेब सीरीज आहे. ज्याला रेड चिलीज एंटरटेनमेंट सपोर्ट करणार आहे.

हे पण वाचा :
‘कांतारा’ फेम अभिनेता चेतन अहिंसावर ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल
अचानक कारच्या चाकाखाली आली बाईक, 10 फूट अंतरापर्यंत फरफटत गेला तरुण
KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांचा अपघात; पायाची नस कापली
IRCTC च्या वेबसाईटद्वारे अशा प्रकारे बुक करा तिकिटे
Indian Army मध्ये नोकरीची संधी; काय आहे पात्रता?

रात्रपाळीस कामावर गेलेली आई मुलासह बेपत्ता

Police Borgaon

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
हॉस्पिटलमध्ये रात्रपाळीस कामावर जाते म्हणून घरातून गेलेली महिला व तिचा 3 वर्षाचा मुलगा घरी परत न आल्याने ते दोघे बेपत्ता झाल्याची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. मनीषा भरत जाधव (वय- 22 वर्षे, रा. नागठाणे) व तिचा मुलगा आदर्श भरत जाधव असे दोघा माय- लेकांची नावे आहेत. या बाबतची फिर्याद भरत पोपट जाधव (मूळ रा. निनाम, सध्या रा. नागठाणे, ता. सातारा) यांनी दिली आहे.

याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला ही नागठाणे येथे तिच्या पतीसह वास्तव्यास आहे. तिचे पती हे शेतीच्या कामासाठी त्यांच्या मूळगावी निनाम येथे गेले होते. सोमवारी सायंकाळी 7 वाजता ही महिला तिच्या लहान मुलासह हॉस्पिटल मध्ये रात्र पाळीस कामावर जाते म्हणून घरातून गेली. दुसऱ्या दिवशी त्यांनी घरी जाऊन पाहिले असता त्यांची पत्नी व मुलगा घरी दिसून आला नाही.

भरत जाधव यांनी पत्नी व मुलाचा सर्वत्र शोध घेतला तरी त्यांना ते मिळून आले नाहीत. या घटनेची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बोरगाव पोलिस आई व मुलाचा शोध घेत आहेत.

पुणे ते लोणावळा केवळ 20 मिनिटांत पोहोचणार; उडणार्‍या बाईकची Booking सुरु

Flying Bike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आतापर्यंत आपण रस्त्यावर चालणाऱ्या बाईक बघितल्या असतील. मात्र आता तंत्रज्ञान एवढे पुढे गेले आहे कि आता तुम्हाला हवेत उडणारी बाइकदेखील (Worlds First Flying Bike) पाहायला मिळणार आहे. आश्चर्य वाटलं ना… पण हे खरं आहे. आकाशात उडणाऱ्या बाईकची बुकिंग सुरू झाली आहे. अमेरिकन एव्हिएशन कंपनी जेटपॅकने जगातील पहिल्या फ्लाइंग बाईकची (Worlds First Flying Bike) बुकिंग घेणे सुरू केले आहे. या बाईकमध्ये 8 पॉवरफुल जेट इंजिन बसवण्यात आले आहे. त्यामुळे आता लोकांची ट्रॅफिकची चिंता मिटली. या बाईकमध्ये 30 मिनिटांत 96 किमीचा प्रवास करण्याची क्षमता असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. चला तर या बाइक विषयी अधिक जाणून घेऊया….

या बाईकचे डिझाईन कशा प्रकारचे आहे?
या बाइकमध्ये आठ जेट इंजिन वापरण्यात आले आहेत. हे जेट इंजिन बाईकच्या चारही कोपऱ्यांवर वापरले जातील. जे रायडरला संरक्षण देण्यास मदत करेल. ही बाईक 136 किलोपर्यंतच्या बाईक रायडरसह 250 किलोपर्यंत वजन उचलण्यास सक्षम असेल.

वेग किती असणार?
हवेतून उडणारी ही बाईक (Worlds First Flying Bike) 250mph वेगाने हवेत उडण्यास सक्षम असणार आहे. या बाईकला व्हिडीओ गेमसारखा कंट्रोल सिस्टीम असणार आहे. ही बाईक हवेत उडण्यासाठी लढाऊ विमानांमध्ये फ्लाय-बाय-वायर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हे हँडग्रिपमध्ये असलेल्या बटणांद्वारे नियंत्रित करण्यात येणार आहे. ज्यामध्ये एक बटण टेक ऑफ आणि लँड करायचे आहे. तर दुसरे बटण उंचीवर नेऊन स्पीड वाढवण्याचे आहे.

किंमत किती असणार?
या बाईकचे (Worlds First Flying Bike) निर्माते जेटपॅक एव्हिएशनने या बाईकसाठी बुकिंग घेणे सुरू केले आहे. या बाईकची किंमत 3.15 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. हि बाईक येत्या दोन-तीन वर्षांत बाजारात दाखल होऊ शकते.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय

घरफोडी करणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात

Wai Police

सातारा प्रतिनिधी |शुभम बोडके
वाई तालुक्यातील धोम कॉलनीतील बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी केल्याप्रकरणी वाई पोलिसांनी तिघांना अटक केली. संशयितांकडून 21 हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पंकज आनंदराव राजपुरे (वय- 28, रा. साक्षी विहार, यशवंत नगर वाई), विलास बबन कोळी (वय- 19 रा. रेल्वे स्टेशनजवळ कोरेगाव) व रवी रमेश काळे (वय- 38, रा, बावधन नाका, वाई) अशी अटक केलेल्या संशयिताची नावे आहेत.

संशयितांनी शुक्रवारी (ता. 30) रात्री धोम कॉलनी येथील बंद घराचे दरवाजाचे कुलूप तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्याने 21 हजार रुपये किमतीचे पाण्याचे नळ व एसी चोरून नेला असल्याची तक्रार डॉ. कासुर्डे यांनी दाखल केली होती. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटी विभागाने करून चोरट्यांना बावधन नाका येथून ताब्यात घेतले.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर, वाईच्या पोलिस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे- खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्री. भरणे व गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलिस हवालदार विजय शिर्के, सोनाली माने, पोलिस कॉन्स्टेबल किरण निंबाळकर, अमित गोळे, श्रावण राठोड, प्रसाद ददुस्कर यांनी केली.

स्कुटीचालक महिलेचा भीषण अपघात! 3 किमी ट्रकने फरफटत नेलं अन्….

accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – काही दिवसांपूर्वी दिल्लीत एका 20 वर्षीय तरुणीला कारने तब्बल 12 किलोमीटरपर्यंत फरफटत (accident) नेल्याची घटना ताजी असताना अशाच प्रकारची एक घटना उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात घडली आहे. यामध्ये एका स्कूटी चालक महिलेला ट्रकने धडक देऊन तिचा मृतदेह तीन किलोमीटरपर्यंत फरफटत (accident) नेला आहे. यानंतर हि महिला स्कुटीसह ट्रकमध्ये अडकली. यादरम्यान ट्रकने मोठ्या प्रमाणात पेट घेतला आणि ती त्यामध्ये जळून खाक झाली.

या अपघाताची (accident) माहिती मिळताच आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यानंतर त्यांनी पीडितेचा मृतदेह ट्रकमधून बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या अपघातातील पीडित महिला हि एका विद्यापीठात लिपिक पदावर कार्यरत होती. मृत महिलेचं नाव पुष्पा असे आहे.

पुष्पा या घरातील वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. यावेळी त्या स्कूटरवरून जात असताना ट्रकने त्यांना धडक दिली. या अपघातानंतर ट्रकने त्यांना 3 किमी पर्यंत ओढत नेले. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या अनेकांनी ट्रक थांबवण्याचा प्रयत्न (accident) केला पण ट्रकचालक काही थांबला नाही अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. मृत पुष्पा या मूळच्या लखनऊ येथील रहिवासी होत्या. या घटनेनंतर आरोपी ट्रकचालक फरार झाला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा :
अंधेरीचा पहिला झटका … मशाल पेटली; सामनातून भाजपवर टीकेचा बाण
जालन्यामध्ये आयशर आणि रिक्षाचा भीषण अपघात! 5 जणांचा जागीच मृत्यू
5 रुपयांच्या ‘या’ नोटेद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपये
Honda पुढील महिन्यात ACTIVA Electric करणार लाँच, जाणून घ्या फीचर्स, किंमत अन् बरंच काही…
VIP मोबाईल नंबर ‘फ्री’ मध्ये मिळवण्याची संधी

शंभूराज देसाईंचे आजोबा थोर पण हे चोर : आ. भास्कर जाधव

Shamburaj Desai Patan

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
राज्यभर पुढे पुढे करणारे मंत्री शंभूराज देसाई देशात दीर्घकाळ चाललेल्या महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादावर, महाराष्ट्रातील थोर पुरुषांचा अपमान होतो. त्यावेळी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्मई, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या बाबतीत तोंड उघडत नाहीत. त्याठिकाणी हिम्मत दाखवत नाहीत. मात्र, ज्या शिवसेना प्रमुखांनी लाल दिवा देऊन सन्मान केला, त्यांचा पक्ष संपवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे पाप करतात. शंभूराज देसाई यांचे आजोबा थोर होते; पण हे चोर निघाले, अशी जहरी टीका आमदार भास्कर जाधव यांनी केले

येथील श्रीमंत रणजीतसिंह पाटणकर स्मारक मंदिरात आयोजित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांचा सत्कार सोहळ्यानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी जिल्हा प्रमुख हर्षद कदम, उपजिल्हा प्रमुख रवी पाटील, तालुका प्रमुख सुरेश पाटील, चिपळूण तालुका प्रमुख संदीप सावंत, सचिन आचरे, गौरव परदेशी, दादा पानस्कर, भरत पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

भास्कर जाधव म्हणाले, “शंभूराज देसाई यांची ओळख चोरवाटा दाखवणारा, अशी महाराष्ट्रात झाली आहे. थोर महापुरुषांची बदनामी करून राजकारण केले जात आहे. महाराष्ट्राचे प्रश्न संपले का, तर नाही. मात्र भारतीय जनता पक्षाने संस्कृती लोकशाही व समाज व्यवस्था बिघडण्याची सुपारी घेतली आहे. सत्तेची मस्ती दहशत या जोरावर खाजगीकरण आणि राजकीय पक्ष संपवण्यासाठी कुटील डाव केले जात आहेत.

पाटणच्या जनतेचा शंभूराज देसाईंनी विश्वासघात केला
पाटणचे लोकप्रतिनिधी शंभूराज देसाई यांचे अलीकडचे बोलणे जमिनीवरून दिसत नाही. हेच शंभूराज देसाई त्यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे ऋणातून मी कसा उतराई होऊ असे म्हणाले होते. आज मात्र त्यांनी विश्वासघात केला आहे. त्यामुळे पाटणची जनता वेळ आल्यावर त्यांचा हिशोब चुकता करील असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे नेते, माजी मंत्री भास्करराव जाधव यांनी व्यक्त केला.

Business Idea : घरबसल्या ‘हे’ व्यवसाय करून मिळवा हजारो रुपये

Business Idea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Idea : जर आपल्याला घरबसल्या एखादा व्यवसाय सुरु करायचा असेल तर आजची ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची ठरू शकेल. हे लक्षात घ्या कि, सध्याचे युग हे डिजिटल युग आहे. आज आपण अशा काही व्यवसायांबाबत जाणून घेणार आहोत. याद्वारे घरबसल्या अगदी आरामात भरपूर कमाई मिळवता येऊ शकेल. मात्र यासाठी आपल्याकडे चांगले इंटरनेट कनेक्शन असावे लागेल. चला तर मग घरबसल्या करता येऊ शकणाऱ्या काही व्यवसायांबाबतची माहिती जाणून घेऊयात…

Introduction to digital marketing | Indian Digital Marketer

डिजिटल मार्केटिंग

आजकाल असे अनेक व्यवसाय आहेत, जे डिजिटल पद्धतीने केले जातात. ज्यासाठी डिजिटल मार्केटिंग खूप महत्त्वाचे ठरते. त्यामुळे आपल्याला डिजिटल मार्केटिंगचा व्यवसाय सुरू करता येऊ शकेल. तसेच त्यासाठी गुंतवणूकीची गरज देखील नाही. याद्वारे गुंतवणूक न करताही चांगले उत्पन्न मिळवता येते. Business Idea

Excellence Publishing Services

इंटरनेट रिसर्च आणि सर्व्हे

सध्याच्या डिजिटल युगात इंटरनेटच्या माध्यमातून चांगली कमाई करता येते. जेव्हा आपण फावल्या वेळेत इंटरनेट वापरतो. त्यावेळी ऑनलाइन सर्व्हे भरू शकता. याद्वारे देखील भरपूर कमाई करता येऊ शकते. Business Idea

4K video playback could be exclusive to YouTube Premium users: Report

youtube द्वारे

गेल्या काही वर्षांत व्हिडिओ कंटेन्टमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. यासाठी YouTube सारखे काही फ्री प्लॅटफॉर्म देखील आहे. ज्यावर अपलोड केलेल्या व्हिडिओंद्वारे भरपूर कमाई करता येऊ शकेल. यासाठी फक्त आपल्याला स्वतःचे यूट्यूब चॅनल तयार करून आपल्या आवडीच्या विषयांवरील व्हिडिओ बनवा. यानंतर तो यूट्यूबवर अपलोड करा. यावर दररोज, आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा व्हिडिओ अपलोड करता येईल. यानंतर, या व्हिडिओद्वारे चांगली कमाई मिळवता येऊ शकेल. सध्या अनेक लोकं यूट्यूबच्या माध्यमातून मोठी कमाई करत आहेत. Business Idea

Online classes: Bane or boon? - The Himalayan Times - Nepal's No.1 English Daily Newspaper | Nepal News, Latest Politics, Business, World, Sports, Entertainment, Travel, Life Style News

ऑनलाइन क्लासेस

जर आपल्याला अभ्यासात स्वारस्य असेल आणि एखाद्या विषयावर चांगले प्रभुत्व असेल तर आपण ऑनलाइन क्लासेस सुरू करू शकता. यानंतर जसजसा क्लास सुरू लोकप्रिय होऊन सदस्य वाढतील, त्यानंतर कमाई देखील वाढेल.

Ultimate Guide to Blogging for Small Businesses in 2023 - Keap

ब्लॉगिंग

जर आपल्याला लिखाणाची आवड असेल, तर आपण ब्लॉग लिहू शकता. हे लक्षात घ्या कि, अशा प्रकारच्या ब्लॉगिंगद्वारे देखील भरपूर कमाई करता येते. जर आपल्याला हे मोठ्या प्रमाणावर करायचे असेल तर यासाठी स्वतःची वेबसाइट देखील बनवता येऊ शकेल. Business Idea

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : 

हे पण वाचा :
Samsung Galaxy F04 : फक्त 7,499 रुपयांत मिळणार Samsung चा ‘हा’ मोबाईल; पहा फीचर्स
Bank locker कसे मिळवायचे ??? या संबंधित नियमांबाबतची माहिती जाणून घ्या
BSNL च्या ‘या’ प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसोबत मिळेल 1000GB डेटा
Multibagger Stock : गेल्या 23 वर्षांत ‘या’ कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस
Google Pixel 7 वर मिळवा 28,000 रुपयांपर्यंतची सूट, अशा प्रकारे घ्या ऑफरचा लाभ

आ. शहाजीबापु म्हणाले, अजित दादांचा ‘स्वराज्यरक्षक’ शब्द बरोबर आहे, पण…

Shahajibapu Patil

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
स्वराज्यरक्षक हा अजित दादांचा शब्द बरोबर आहे. परंतु त्याचबरोबर छ. संभाजी महाराज हे स्वराज्य विस्तारकही होते, आणि ते कडवे हिदु धर्मवीर होते. अजित दादांनी स्वराज्य रक्षक शब्दाबरोबर धर्मवीर संभाजी महाराज असे म्हटले. तर ते महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील जनतेला ते आवडेल. तेवढा अजित दादांनी वैचारीक मोठेपणा दाखवावा, असा टोला बाळासाहेबांची शिवसेना गटाचे आ. शहाजीबापु पाटील यांनी लगावला आहे.

कराड येथे एका खासगी कार्यक्रमानिमित्त शहाजीबापु पाटील आले होते. त्यावेळी त्यांनी हॅलो महाराष्ट्रशी संवाद साधला. छ. संभाजी महाराज यांना धर्मवीर व स्वराज्यरक्षक म्हणण्यावरून सध्या राज्यात वाद निर्माण झाला आहे. यावरून आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्वराज्यरक्षक हेच बरोबर आहे. धर्मवीर नव्हे तर स्वराज्यरक्षक या शब्दावर ठाम असल्याचे म्हटले होते. त्यावरून शहाजीबापु यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

वीज कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही
शिंदे- फडणवीस सरकारची धोरणे ही लोकहिताची आहेत. या धोरणात वीज कर्मचाऱ्यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही. अशा पध्दतीचं धोरण आखलेलं आहे. जे धोरण सरकारने स्विकालेलं आहे, ते महाराष्ट्र राज्याच्या फायद्याच आहे.

Garlic Side Effects : ‘या’ लोकांनी चुकूनही लसूण खाऊ नये, अन्यथा…

Garlic side effects

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या दैनंदिन जीवनात लसूण (Garlic)हा नेहमीचा लागणारा आणि रोजच्या वापरातील पदार्थ आहे. लसणाशिवाय कोणतीही भाजी किंवा आमटी तयार होऊ शकत नाही. त्यामुळे लसणाचे महत्त्व आनन्यसाधारण आहे. काहीजण तर आवडीने कच्चाच लसूण खातात. खरं तर लसूण खाल्ल्याने आपल्याला मोठे आरोयदायी फायदे होतात. परंतु, काही लोकांसाठी मात्र लसूण खाण हानिकारक (Garlic Side Effects) ठरू शकत.

ज्या लोकांना अॅसिडिटीचा (Acidity) त्रास आहे अशा लोकांनी लसूण खाणं टाळावं. लसूण खाल्ल्याने त्यांच्या छातीत जळजळ होऊ शकते. याशिवाय अॅसिडिटीचा त्रास असलेल्यां व्यक्तींनी रिकाम्या पोटी तर अजिबात लसूण खाऊ नये.

ज्या लोकांना नेहमी पोटाची समस्या असते अशा लोकांनीही लसणाचे सेवन करू नये, यामुळे तुमची समस्या आणखी वाढू शकते.

जर तुम्हाला खूप डोकेदुखी होत असेल तर लसणाचे सेवन करू नका. कच्चा लसूण तुमची डोकेदुखी वाढवू शकतो.

जर तुम्हाला श्वासाची दुर्गंधी आणि शरीराला घाम येण्याची समस्या असेल तर तुम्ही लसणाचे सेवन अजिबात करू नये. यामुळे तुमचा त्रास आणखी वाढू शकतो.

अनेक वेळा हृदयरोगी किंवा उच्च रक्तदाबाचे रुग्ण रक्त पातळ करण्यासाठी औषधे घेतात, अशा स्थितीत अशा व्यक्तींनी लसणाचे सेवन मर्यादित प्रमाणातच करा.