अमरावती : बच्चू कडू देणार शिवसेनेला पाठिंबा ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई 

अमरावती लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी केवळ चार दिवस बाकी असताना प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज अमरावतीमध्ये बैठक सुरू केली आहे या बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कुणाला पाठिंबा द्यावा यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे बोलल्या जात आहे. . तर आतापर्यंतची प्रहार पक्षाची पार्श्वभूमी बघता लोकसभेसाठी शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांना प्रहार पक्ष पाठिंबा देणार असल्याची दाट शक्यता वर्तवल्या जात आहे .

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या प्रतिष्ठेच्या लढाईत काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीतर्फे ऊमेदवार नवनीत राणा व भाजप सेना युती असणारे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्यामध्ये कमालीची लढाई होणार असल्याचा सूर संपूर्ण जिल्ह्यामधून ऐकण्यास मिळत आहेत.  त्यातच शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांच्यावर अमरावती जिल्ह्यातून नाराजीचा सुर उमटू लागल्याने काँग्रेस राष्ट्रवादीच्या महाआघाडीतर्फे असलेल्या नवनीत कौर राणा यांच्या बाजूने जनतेचा महाकौल असल्याची दाट शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.

त्यात अमरावती येथील प्रहार पक्षाची आज बैठक सुरू झालेली आहे यामध्ये प्रहार पक्षाचे बच्चू कडू हे शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याची दाट शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे . तर प्रहार या संघटनेचा पाठिंबा जर शिवसेनेचे आनंदराव सूळ यांना मिळाला तर त्याचे मतांमध्ये कीती प्रमाणात परिवर्तन होईल हे निवडणुकीच्या निकालानंतरच पूढे येईल. मात्र प्रहार पक्षाचे शिवसेनेला लोकसभेसाठी पाठिंबा मिळाल्यास नवनीत राणा यांना जास्त फरक पडणार नसल्याचेही राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि  हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी  आजच आमचा  WhatsApp  ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

कॉलर दिवसभर टाईट राहू शकत नाही, माझी मिशी दिवसभर टाईट राहते : नरेंद्र पाटील

काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांचा हर्षवर्धन जाधव यांना जाहीर पाठिंबा

बच्चू कडू लढणार जालण्यातून लोकसभा, रावसाहेब दाणवेंना देणार टक्कर

राहुल गांधी, अरविंद केजरीवाल शेतकर्यांसोबत दिल्लीच्या रस्त्यांवर

शेतकऱ्यांना आम्ही दिलेली मदत त्यांना कमीच वाटणार, सदाभाऊ खोत यांचा राज ठाकरे, जयंत पाटील यांना टोला

Leave a Comment