माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांचा राजकीय संन्यास; फेसबुक पोस्ट द्वारे केली घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नांदेड । ४३ वर्षे राजकारणात होते. एखाद्या राजकुमारीसारखी राहिले. ४०० रुपयांची साडी ४ हजाराच्या थाटात नेसली. मन लावून काम केले. आता आजूबाजूला असणारे लोक अनोळखी वाटत आहेत. अशा अनोळखी प्रांतात मनस्वी रमता येत नाही. म्हणून मी माझा राजकीय प्रवास आता थांबवत आहे, अशी भावूक पोस्ट फेसबुकवर लिहून माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपच्या नेत्या सूर्यकांता पाटील यांनी राजकीय संन्यासाची घोषणा केली आहे.

सूर्यकांता पाटील यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला होता. भली मोठी राजकीय कारकिर्द असलेल्या पाटील यांचं भाजपमध्ये मन न रमल्याने अखेर त्यांनी राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय फेसबुकवरून जाहीर केला आहे. गेल्या ४३ वर्षात सर्वांनीच सन्मान दिला. अनेक पदे मिळाली. त्याबद्दल माझी काहीच तक्रार नाही. आता मला काहीही मिळवायचे नाही. एकटीने सगळं जिंकलंय. लोकांना कंटाळा यावा इतपर्यंत प्रवास करण्याची माझी इच्छा नाही. पण फार खुज्या प्रांतात प्रवासी झालो याची खंत आहे. तरीही माझा निस्वार्थी प्रवास मला फार समृद्ध करून गेला. त्यामुळे मी माझा राजकीय प्रवास थांबवित आहे, असं सांगतानाच राजकीय प्रवास थांबवला तरी नव्या पिढीसाठी काम करत राहणारच आहे. घरी बसणार नाही, असं पाटील यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

https://www.facebook.com/suryakanta.patil.18/posts/1289049537963866

सूर्यकांता पाटील यांचा राजकीय प्रवास
१९८०मध्ये हदगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या सूर्यकांता पाटील या १९८६मध्ये राज्यसभेवर निवडून गेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी ३ वेळा हिंगोली-नांदेड लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्वही केलं आहे. पाटील यांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. ४ वेळा खासदार, एकदा आमदार आणि केंद्रीय ग्रामविकास  राज्यमंत्री, संसदीय कार्य राज्यमंत्री आदी विविध पदे त्यांनी भूषिविले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment