उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून आले आणि कोरोना आला हाच त्यांचा पायगुण ; नारायण राणेंची जहरी टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून आले आणि कोरोना आला हा त्यांचा पायगुण आहे, अशी जहरी टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली. ठाकरे सरकारला एक वर्षपूर्ण झालं. त्यानिमित्ताने नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली. या सरकारला वर्षपूर्ती झाली. पण जनतेची इच्छापूर्ती झाली नाही असं ते म्हणाले.

गेल्या वर्षभरात महाराष्ट्राचा कोणत्याच क्षेत्रात अव्वल नंबर आला नाही. इतकी महाराष्ट्राची पिछेहाट झाली आहे. कोरोनामुळे एकट्या महाराष्ट्रात 50 हजार लोकांचा मृत्यू झाला. इतर राज्यांच्या तुलनेत कोरोना मृत्यूंची महाराष्ट्रातील संख्या सर्वाधिक आहे. इतर कशात नाही, पण कोरोना बळी आणि कोरोनाच्या वाढत्या संख्येत महाराष्ट्र नंबर वन झाला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी वर्षपूर्ती निमित्त दिलेल्या मुलाखतीत हात धुवून मागे लागण्याचा इशारा दिला आहे. नक्की कुणाच्या विरोधात मागे लागणार हे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करावं. जनतेच्या मागे हात धुवून लागण्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री झाला आहात का? असा सवाल करत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल चढवला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment