महिन्यभरच्या तीव्र संघर्षानंतर संचित पायलट-अशोक गेहलोत यांचे मनोमिलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जयपूर । राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या शिष्टाईमुळे काँग्रेस नेते सचिन पायलट यांचं बंड शमलं. त्यांची काँग्रेसमध्ये घरवापसी झाली. यानंतर सचिन पायलट हे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. बंड शमल्यानंतर पहिल्यांदाच सचिन पायलट हे गेहलोत यांच्या भेटीला पोहचले आहेत. शुक्रवारपासून राजस्थान विधानसभेचं अधिवेशन सुरु होतं आहे. या अधिवेशनात काय रणनीती आखायची या चर्चेत ते सहभागी होण्यासाठी सचिन पायलट हे अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत.

सचिन पायलट यांनी काँग्रेस पक्षाविरोधात बंडाचा झेंडा उगारला होता. एवढंच नाही तर गेहलोत सरकार अल्पमतातही आलं होतं. कारण आपल्यासोबत १८ पेक्षा जास्त आमदार घेऊन सचिन पायलट बाहेर पडले होते. त्यानंतर मागील दीड महिन्यापासून सचिन पायलट विरुद्ध मुख्यमंत्री अशोक गेहलोत असा सामना रंगला होता. बंडानंतर सचिन पायलट यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यांना उपमुख्यमंत्रीपदावरुनही हटवण्यात आलं. त्यानंतर सचिन पायलट हे भाजपासोबत हातमिळवणी करतील किंवा वेगळा पक्ष स्थापन करतील अशी परिस्थिती निर्माण झाली होती. याबाबत गेहलोत यांनी सचिन पायलट यांच्यावर जाहीर आरोपही केले होते. अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांना निक्कमा म्हटलं होतं. त्यामुळे सचिन पायलट चांगलेच नाराज झाले होते.

या सगळ्यात सचिन पायलट यांनी मौन राहण्याची भूमिका घेतली. याशिवाय आपण भाजपमध्ये सामील होत नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, सचिन पायलट यांचे बंड फसले असल्याचे चर्चा होत असताना. सचिन पायलट यांनी काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळीच सचिन पायलट यांची घरवापसी होणार हे निश्चित झालं होतं. अपेक्षेप्रमाणे तेच घडलं. आता बंड थंड झाल्यानंतर सचिन पायलट हे पहिल्यांदाच मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. शुक्रवारी होणाऱ्या अधिवेशानासंबंधीची चर्चा या दोघांमध्ये होते आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment