देश कठीण प्रसंगातून जात आहे – सरन्यायाधिश शरद बोबडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । देश सध्या कठीण परिस्थितीतून जात असल्याचे मत सरन्यायाधिश शरद बोबडे यांनी व्यक्त केले आहे. सुधारित नागरिकत्व कायद्यावर सरन्यायधीश बोबडे यांनी आपले मत व्यक्त केले असून नागरिकत्व सुधारणा कायदा घटनात्मक असल्याचं जाहीर करावं अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. यावर, सरन्यायाधीश शरद बोबडे प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान संसदेकडून संमत करण्यात आलेल्या कायद्याला घटनात्मक कसं काय जाहीर करु शकतो ? न्यायालयाचं काम कायद्याची वैधता निश्चित करणे आहे. घटनात्मकता जाहीर करणं नाही, असे यावेळी खंडपीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. वकील विनीत ढांडा यांनी सुधारित नागरिकत्व कायदा घटनात्मक असल्याचं जाहीर करावं तसंच याबाबत अफवा पसरवणारे कार्यकर्ते, विद्यार्थी आणि प्रसारमाध्यमांवर कारवाई केली जावी अशी मागणी याचिकेतून केली होती.

यावेळी याचिकाकर्त्याने न्यायालयाकडे केंद्राला हा कायदा घटनेच्या विरोधात तसंच भारताच्या कोणत्याही नागरिकाविरोधात नसल्याचं स्पष्ट करावं असा आदेश केंद्र सरकारला देण्याची मागणीही याचिकेतून केली होती.

महाराष्ट्रच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकिंग बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 8080944419 या नंबरवर WhatsApp करा आणि लिहा Hello News

Leave a Comment