नवी दिल्ली । गलवान खोऱ्यातील भारत-चीन दरम्यानच्या संघर्षानंतर देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसने भारत चीन सीमेवर काय सुरु आहे हे जनतेला सरकारने स्पष्टपणे सांगावे अशी मागणी केली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणीही भारतामध्ये घुसखोरी केलेली नाही असं वक्तव्य केलं. यानंतर भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदींनी जपून वक्तव्य करावीत असा सल्ला दिला. मात्र मनमोहन सिंग यांच्या या सल्ल्यावर २२ जून रोजी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ट्विटवरुन काँग्रेसवर निशाणा साधला. मात्र, टीका करण्याच्या नादात नड्डा यांनी आकडेवारी सांगतांना मोठी गफलत केल्यानं त्यांची ट्विटवर फजिती झाली आहे.
Dr. Manmohan Singh belongs to the same party which:
Helplessly surrendered over 43,000 KM of Indian territory to the Chinese!
During the UPA years saw abject strategic and territorial surrender without a fight.
Time and again belittles our forces.
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) June 22, 2020
जे. पी. नड्डा यांनी ट्विटवरुन काँग्रेसवर निशाणा साधतांना म्हटलं होत “४३ हजार किमी भारतीय भूमी चीनला बहाल करणाऱ्या काँग्रेस पक्षाचेच डॉ. मनमोहन सिंग हे नेते आहेत. यूपीएच्या काळात कोणतंही युद्ध न होता आपला भूभाग गमावला. सातत्यानं आपल्या सैन्य दलांचा अपमान केला गेला,” असं नड्डा म्हणाले होते. आता तुम्ही म्हणाल ट्विटमध्ये काय चूक केली. तर ती चूक अशी कि, नड्डा यांच्या या ट्विटमधील ४३ हजार किमी हे अंतर पृथ्वीच्या एकूण परिघापेक्षा तीन हजार किमी जास्त आहे. पृथ्वीच्या एकूण परिघ ४०,०७५ किमी इतका आहे आणि नड्डा सांगत आहेत कि, ४३ हजार किमी भारतीय भूमी काँग्रेस पक्षाचे डॉ. मनमोहन सिंग यांनी चीनला बहाल केली. या गणितीय चुकीमुळं नेटकऱ्यांनी भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांवर टीका केली आहे.
From Srinagar to kanyakumari, its only 3200 kms pic.twitter.com/ojp0Vu72Jb
— Ebenezer Samuel (@ebenezersamuell) June 22, 2020
कांग्रेस राज में चीन ने 43,000 किमी जमीन हड़पी : *जे.पी. नड्डा*
*नोट :* पृथ्वी की परिधि 40,075 किमी है
तो सोचा आपको भी बता दूं???????????? pic.twitter.com/7SXsPpr9E1— RISHIRAJ MANDAWAT (@im_rishi18) June 26, 2020
Sir earth circumference is 40075 kms so how can Dr Manmohan Singh surrender 43000 kms , we are educated Indians , can u explain where did the balance 3000 kms came from. pic.twitter.com/U0g06DET4a
— Karan Singh Walia (@karansinghw1) June 26, 2020
Naada ji, Congress must have done really bad. Imagine the distance between Karachi and Beijing is only 4860 km. So what must have been 43000 km. pic.twitter.com/tSI5hFaVQw
— Tabrez I Padvekar (@tttabrez) June 25, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”