आता स्वतःला अटक कराल का ?? ; जुन्या घटनेची आठवण करत निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रिपब्लिक वाहिनीचे संस्थापक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि विरोधक भाजप यांच्यातील आरोप प्रत्यारोपाच्या फैली सुरूच आहेत. अर्णब गोस्वामीला अटक ही राजकिय सूडबुद्धीने करण्यात आली आहे असा आरोप भाजप कडून करण्यात येत आहे.

अर्णब गोस्वामी यांना वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर राज्यात आणीबाणीची आठवण करुन देणारी परिस्थिती निर्माण झाली असल्याची टीका भाजपकडून केली जात आहे. दरम्यान एका जुन्या घटनेची आठवण करुन देत स्वतःला अटक करणार का? अशी विचारणा भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे.

उस्मानाबादमधील दिलीप ढवळे आत्महत्येसंबंधीच्या बातम्यांचे स्क्रीनशॉट निलेश राणे यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत. कराल काय स्वतःला अटक??? न्या स्वतःला फरफटत. दाखवून द्या न्याय सगळ्यांसाठी एक असतो, असे निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment