शिवारच मोकळं पडल्यावर शिवथाळी आणणार कोठून? राजू शेट्टींचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
भारतीय किसान सभेच्यावतीने देशभरातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आणि सरसकट कर्जमाफीसाठी येत्या ८ जानेवारीला देशभर कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. या बंदमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी होणार असून बंद वेळी म्हणजेच ८ तारखेला शेतकऱ्यांची काय ताकत आहे, हे सरकारला समजेल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय. ते कोल्हापूरात बोलत होते.

दरम्यान शिवथाळी बाबत राजू शेट्टी यांना विचारलं असता शिवारात पिकवणाऱ्या शेतकऱ्याकडे पहिला बघा जर शेतकऱ्यांचे शिवारच मोकळं पडलं तर शिवथाळीमध्ये अन्न आणणार कोठून शेवटी आयातच करावं लागेल अशा शब्दात राजू शेट्टी यांनी खरमरीत टीका केली. दरम्यान ८ जानेवारीला बंद नियोजनाबाबत आज कोल्हापूरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राजू शेट्टी यांनी ही टीका केली.

Leave a Comment