शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही तर या राज्य सरकारचा सातबारा कोरा केला जाईल ; आठवलेंचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात परतीच्या पावसामुळे अतिवृष्टी आली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना मदतीची गरज असून यावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांच्यात कलगीतुरा रंगला आहे. त्यावरुन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केले आहे. मुख्यमंत्री होण्याआगोदर उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असं सांगत होते. तुम्ही आता मुख्यमंत्री झाला आहात तुम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही तर या राज्य सरकारचा सातबारा कोरा केला जाईल असा टोला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लगावलाय.

शरद पवार जेष्ठ नेते, त्यांचा कायम आदर करतो

शरद पवारांचा मी आदर करतो ते ज्येष्ठ नेते आहेत.  पवार साहेब एनडीएमध्ये येऊन पंतप्रधान मोदींच्या खांद्याला खांदा लावून काम करावं अशी माझी इच्छा होती म्हणून मी ती व्यक्त केली. यात पवार साहेबांचा अनादर करणे हा माझा उद्देश नव्हता असे आाठवलेंनी स्पष्ट केले.जरी पवार साहेबांनी माझ्याविषयी टीका केली असली तरी मी त्याविषयी नाराज नाही त्याविषयी मी बोलणार नाही. कारण शरद पवार हे आमचे नेते असल्याचे ते म्हणाले.

केंद्राकडून मदत मिळण्यासाठी पंतप्रधान मोदींना लिहिणार पत्र

शरद पवार यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलेल आहे. मी सुद्धा पंतप्रधानांना पत्र लिहून महाराष्ट्राला मदत देण्याबाबत मागणी करणार आहे. ज्या महाराष्ट्राने मला राज्यात एकदा मंत्री केलं केंद्रात दोनदा मंत्री केलं अनेक वेळा खासदार केलं अशा महाराष्ट्राला अडचणीच्या काळात केंद्राकडून मदत मिळवण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे आठवले म्हणाले.

खडसेंसोबत अन्य आमदार जाणार नाहीत

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जात असले तरी त्यांच्यावर अन्य आमदार राष्ट्रवादीत जाणार नाहीत. भाजपचे आमदार राष्ट्रवादी जाणार ही फक्त अफवा आहे. राष्ट्रवादीला आता जाऊन काही उपयोग सुद्धा नाही. कारण अगोदरच त्याठिकाणी सर्व मंत्री पद भरलेली असल्याचे आठवले म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment