बिहारच्या जनतेने नितीशकुमारांना सन्मानाने निरोप द्यायला हवा ; संजय राऊतांचा चिमटा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | यंदाची बिहारची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. आज बिहारच्या निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यासाठी मतदान होत आहे, मात्र प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ही आपली शेवटची निवडणूक असल्याचं जाहीर करत माझ्या पक्षाला विजयी करा असं भावनिक आवाहन बिहारी जनतेला जाहीर सभेतून केलं होतं, नितीश कुमारांच्या या वक्तव्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी चिमटा काढला आहे.

याबाबत शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, नितीश कुमार हे खूप मोठे नेते आहेत, त्यांनी आपला डाव खेळला आहे. जर कोणी नेता म्हणत असेल ही माझी शेवटची निवडणूक आहे तर त्यांना सन्मानाने निरोप द्यायला हवा. बिहारची जनताही नितीश कुमारांना निरोप देण्याच्या संधीची वाट पाहत होती, या निवडणुकीत जनता नितीश कुमार यांना निवृत्त करेल असा टोला राऊतांनी लगावला आहे.

ही माझी शेवटची निवडणूक आहे. त्यामुळे माझ्या पक्षाला विजयी करा. ज्याचा शेवट गोड, ते सगळंच गोड, असं नितीश कुमार म्हणाले होते, तसेच.’आज निवडणुकीचा शेवटचा दिवस आहे. मतदान आहे आणि ही माझी शेवटची निवडणूक आहे, आमच्या उमेदवाराला विजयी कराल ना, असा प्रश्नदेखील नितीश कुमारांनी जनतेला विचारला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment