उदयनराजेंच्या शपथविधीच्या वादावर वैंकय्या नायडूंची प्रतिक्रिया, म्हणाले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांना जय शिवाजी, जय भवानीच्या घोषणा दिल्याबद्दल राज्यसभेत समज दिल्यानंतर राजकीय पडसाद उमटले. या मुद्द्यावरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने भाजप आणि व्यंकय्या नायडूंवर जोरदार टीका केली. या सगळ्या टीकेनंतर आता वैंकय्या नायडू यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे.

”मी नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा आणि देवी भवानीचा भक्त आहे. रिती-रिवाजानुसार शपथ घेताना कोणत्याही प्रकारच्या घोषणा दिल्या जात नाहीत, याची आठवण मी सदस्यांना करून दिली. कोणताच अनादर केला नाही,” असं ट्विट वैंकय्या नायडूंनी केलं आहे. दरम्यान खासदार उदयनराजे भोसले यांनाही वादावर आपली भूमिका स्पष्ट केली. शिवाजी महाराजांच्या नावाने याआधी भरपूर राजकारण झालं आहे. महाराजांचा अवमान झाला असता तर मी गप्प बसलो नसतो, मी तिथल्या तिथे राजीनामा दिला असता. जे काही घडलंच नाही, परंतु असं भासवायचं काम करु नका, असं आवाहन उदयनराजे भोसले यांनी केलं.

नेमकं काय घडलं होतं राज्यसभेत?
उदयनराजे भोसले यांनी राज्यसभा सदस्यत्त्वाची शपथ घेतल्यानंतर ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. यानंतर उदयनराजे भोसले कागदपत्रांवर स्वाक्षरी करत असताना सभापती व्यंकय्या नायडू यांनी म्हटले की, हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नसून माझ्या दालनात होत आहे. हे रेकॉर्डवरही घेतलं जात नाही. सभागृहात कोणत्याही घोषणा देण्यास परवानगी नाही. नवीन सदस्यांनी भविष्यात हे लक्षात ठेवावे. हे सांगत असताना उदयनराजेंनी नायडू यांच्याकडे कटाक्ष टाकला. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment