निवडणुकांनंतर काँग्रेसच्या बॅगा उचलणारे व्हायचे नाही – प्रकाश आंबेडकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अकोला प्रतिनिधी | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या कक्षात आणण्यासाठी काँग्रेसला दिलेल्या प्रस्तावानुसार आराखडा सादर होत नाही, तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीतर्फे लोकसभेच्या आघाडीसाठी तडजोड करणार नाही, असा इशार बहुजन वंचित आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला दिला. आज शहरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आघाडीतील कळीचा मुद्दा आरएसएस हा असून तो मान्य करुन घेण्याची हीच योग्य वेळ आहे. मात्र हे करत असताना निवडणुकीनंतर काँग्रेसच्या बॅगा उचलणारे आम्हाला व्हायचे नाही, असेही ते यावेळी म्हणाले. काँग्रेसशी आघाडीबाबत आरएसएसच्या मुद्द्यावर प्रतीक्षा करू, असे त्यांनी जाहीर केले. पुण्यात वंचित आघाडीच्या सुकाणू समितीची बैठक सुरू असून या बैठकीत काय निर्णय होतो, तो श्रीरामपूरच्या सभेत जाहीर करणार आहोत अशी माहिती यावेळी आंबेडकरांनी दिली.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत मंगळवारी मुंबईत बैठक झाली. ही चर्चा संघाला संविधानाच्या चौकटीत बसविण्यासाठी निवडणुकीपूर्वीच काँग्रेसने आराखडा द्यावा, या मुद्यावर अडली. कोणताही निर्णय या बैठकीत झाला नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले. आरक्षणाच्या मुद्यावर काँग्रेस नेत्यांनी वरिष्ठांसोबत बोलून काही निर्णय घेतला तर आघाडीची चर्चा पुढे सरकू शकते, असे संकेत यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीबाबत दिले.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

साताऱ्याच्या पुरोगामी गादीवर प्रतिगामी बसलेत, आबेंडकरांचा उदयनराजेंवर घरातघुसून हल्लाबोल

प्रकाश आंबेडकरांनी आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नये – शरद पवार

प्रकाश आंबेडकरांचे RSS ला आव्हान, हिम्मत असेल तर आमचं हे चेलेंज स्वीकारा

Leave a Comment