ट्रेन चालू करण्याबाबत रेल्वेचा स्पेशल प्लान? लागू होऊ शकतात हे ५ नवे नियम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वेने ३ मे पर्यंत आपल्या सर्व प्रवासी गाड्या रद्द केलेल्या आहेत. इतकेच नाही तर ३ मे नंतर करण्यात येणारे रेल्वेचे रक्षणही थांबविले आहे.रेल्वे प्रवाशांना हा संदेश पाठविणे हे त्यामागचा उद्देश आहे. ४ मे नंतर लोकांनी कोणताही अंदाज वर्तवू नये किंवा रेल्वे स्थानकांकडेही जाऊ नये.लॉकडाउननंतर जेव्हा कधी गाड्या सुरु होतील तेव्हा त्याविषयीची माहिती देण्यात येईल.सर्व राज्यांशी चर्चा झाल्यावरच केंद्र सरकार या विषयावर पुढचे आदेश देईल.दरम्यान, यावेळी कोरोना ज्या पद्धतीने सातत्याने वाढत आहे,हे स्पष्ट आहे की जेव्हा ट्रेन सुरू होतील तेव्हा ते कोरोनाच्या भीतीच्या सावटाखाली धावतील.त्यामुळे रेल्वेमधील वेगवेगळे झोन आणि विभागांचे अधिकारीही त्याविषयीच्या विविध शक्यतांचा विचार करीत आहेत.त्यातील काही शक्यता पुढीलप्रमाणे असण्याची आहे.

१. जेव्हा ट्रेनचे कामकाज सुरू होईल तेव्हा सुरुवातीला काही मोजक्याच निवडलेल्या गाड्या धावल्या जातील.हया गाड्या ह्या विशेष गाड्यांसारख्या असलय पाहिजेत आणि त्याचे भाडेही जास्त ठेवले पाहिजे.यामुळे सुरुवातीलाच रेल्वेगाड्यांमध्ये होणारी गर्दी कमी होण्यास मदत होईल आणि केवळ तेच लोक यातून प्रवास करतील ज्यांच्यासाठी प्रवास करणे हे अत्यंत आवश्यक आहे.

२ .९ मार्चपासून रेल्वेने दिव्यांग, विद्यार्थी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या तिकिटांवर मिळणारी सवलत वगळता इतर सर्व सवलतींवर बंदी घातली आहे.गाड्यांमधील गर्दी कमी करणे हे त्यामागील उद्दीष्ट होते.विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेने प्रवास करण्यापासून दूर ठेवावे लागेल. जास्तीत जास्त लोकांना प्रवासापासून दूर ठेवण्यासाठी रेल्वे ही या अटींसह सुरू राहण्याची शक्यता आहे.

First India-Nepal passenger train on broad gauge likely to begin ...

३.प्रारंभी रेल्वेचे फक्त स्लीपर क्लासच धावतील.यामध्ये केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या लोकांनाच प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी.यामुळे सामान्य लोकांची होणारी गर्दी टाळता येईल. दुसरीकडे,एसीच्या बंद वातावरणात संक्रमण होण्याची शक्यताही स्लीपर ट्रेनमुळे टाळता येऊ शकते.

४.रेल्वेने स्लीपर क्लासच्या ५ हजाराहून अधिक डब्यांचे आयसोलेशन वॉर्डमध्ये रुपांतर केले आहे. त्यासाठी मधली सीट काढली गेली आहे. तथापि, आयसोलेशन वार्ड म्हणून याची आवश्यकता भासलेली नाहीये.तसेच उष्णतेच्या वातावरणामुळे त्यांचा सध्या वापर होण्याची शक्यताही कमीच आहे. अशा परिस्थितीत रेल्वे या डब्यांचा वापर करून स्लीपर -२ म्हणून स्पेशल क्लास गाड्यादेखील धावू शकतात.यामुळे सोशल डिस्टंसिंगचे अनुसरण करण्यासही मदत होईल.

५. सुरुवातीला, काही निवडक स्थानकांदरम्यान आणि ज्या ठिकाणी कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण जास्त आहे तेथून कोणीही येऊ नये किंवा तेथून कोणीही जाऊ नये.रेल्वेसमोरचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे त्याचे लाखो कर्मचारी आणि प्रवासी यांना सुरक्षित ठेवणे हे आहे.आरोग्य मंत्रालय व गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार सर्व प्रोटोकॉल त्यांना पाळावे लागतील. अशा परिस्थितीत जेव्हा कधी प्रवाशांसाठी रेल्वे सेवा सुरू होईल,तेव्हा रेल्वेमधील प्रत्येकाच्या सुरक्षेची मोठी जबाबदारी त्यांच्यावर असेल.म्हणूनच, रेल्वे आपल्या कामकाजाविषयीच्या अनेक शक्यतांचा विचार सद्य स्तिथीत करत आहे.

New Year Shocker: Indian Railways Hike Passenger Fares From Today

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment