Tuesday, June 6, 2023

ऑक्सिजन अभावी सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा दावा; मात्र रेकॉर्डवर एकही नोंद नाही

औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे संपूर्ण राज्यभर प्रादुर्भाव बघायला मिळत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना कोरोनाबाधित रुग्णांच्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असल्याचे उघडकीस आले होते. ऑक्सिजन नसल्यामुळे 6 रुग्णाचा मृत्यू झाल्याचा दावा काही नातेवाईकांनी केला होता. परंतु सरकारी नोंदीनुसार ऑक्सिजन उपलब्ध नसल्यामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. असे आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

रिक्त सिलेंडर लावून ऑक्सिजन देण्याची नाटक करणे, ऑक्सिजनची गरज आहे की नाही याकडे लक्ष दिले नाही, पण रुग्ण वेळेवर येऊ शकले नाहीत यासारख्या प्रकरणांमध्ये रुग्णांची काळजी घेण्यात आली नाही. असा आरोप मृत रुग्णांच्या नातेवाइकांनी केला आहे. आणि दुसरीकडे असं काहीही घडलं नसल्याचा दावा आरोग्य प्रशासनाने केलेला आहे. सिव्हिल हॉस्पिटल मध्ये चार, खाजगी आणि सरकारी रुग्णालयात एक रुग्णाचा ऑक्सीजन अभावी आणि रेमडेसिवीर डोस जास्त प्रमाणात दिल्यामुळे इंजेक्शन घेतल्यानंतर त्याला ऑक्सिजनच्या आधारावर ठेवल्या गेले होते. त्यानंतर विषाणूजन्य संसर्गामुळे त्यांचा मृत्यू झाला. ते औरंगाबाद येथे उपचारासाठी आले होते.

आरोग्य महानगरपालिका अधिकारी (एमओएच) डॉ. नीता पडळकर म्हणाल्या, ” उपलब्ध सर्व ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड रूग्णांच्या ताब्यात होते. ऑक्सिजनची कमतरता होती पण जेव्हा त्यांनी मागणी केली तेव्हा त्यांना वेळेत बेड पुरवले जात होते. जिल्हा प्रशासन व एएमसी प्रशासन या परिस्थितीवर लक्ष ठेवून होते, परंतु ऑक्सिजनच्या अभावी रूग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.