केंद्राने घटनादुरुस्ती केली तरच मराठ्यांना आरक्षण; प्रकाश आंबेडकर यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात त्याचे राजकीय पडसाद उमटत आहे. आरक्षण रद्द का झाले यावरून राज्य सरकार आणि भाजप मध्ये खडाजंगी होत असून एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप होत आहेत. याच दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. केंद्र सरकारने केलेली १०२ वी घटना दुरुस्ती मराठा आरक्षणात अडथळा ठरत असल्याचे त्यांनी म्हंटल.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची सुरुवातीपासूनची भूमिका आहे पण केंद्र सरकारने केलेली १०२ वी घटना दुरुस्ती अडसर ठरत आहे. कायदेशीर सवलतीसह आरक्षण हवे असल्यास घटना दुरुस्ती करण्यास केंद्र सरकारला भाग पाडावे लागेल, अशी सूचनाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.

मराठा आरक्षण लढ्याचे दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाचे रणशिंग बुधवारी कोल्हापुरातून फुंकले गेले. या आंदोलनात  संभाजीराजे यांच्यासमवेत आंबेडकरदेखील सहभागी झाले होते. पण त्यांनी जाहीर भाषण टाळत केवळ पाठिंबा दर्शवत शांत राहणेच पसंद केले तसेच आरक्षणाबाबतच्या कायदेशीर बाबींवर बोट ठेवले.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment