सुदाम्या टाईप बामण मित्रांचा विषय लय खोलंय – कुणाल गायकवाड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कुणाल गायकवाड

ब्राम्हण मोर्चांची खिल्ली उडवणं चुकच, अर्थात ते मोर्चे आणि मागण्या कितीही विनोदी वाटत असल्या तरीही

ब्राम्हण संघटनांनी आरक्षणासंबधी काही मागणी केली, त्यावर कुणीही कुत्सीत टोमणे मारण्याची गरज नाही. लोकशाही मार्गाने मागण्या होऊ द्या, कायच हरकत नाही. खरंखोट गुऱ्हाळ होत राहील. मराठा आरक्षणासंबधी काही ब्रम्हवृंदांनी कुत्सीत टोमणे मारले होते, तर काहीजण तार्कीक विरोध न करता निव्वळ मळमळ बाहेर काढत होते, आता त्याची प्रतिक्रीया म्हणून ब्राम्हण मोर्चांची खिल्ली उडवणं चुकच, अर्थात ते मोर्चे आणि मागण्या कितीही विनोदी वाटत असल्या तरीही. त्यामुळे कोणाचही बहुसंख्यत्वाचं राजकारण वाईटच.

आयुष्यात बरेच जीवाला जीव देणारे अन् एका गांडीनं हगणारे बामण मित्र हायेत, राहतील. ते फक्त मित्रच आहेत, ब्राम्हण नाहीत. अर्थात समाजशास्त्रात असं बोलता येत नस्तय म्हणा. मित्र इकल्डे पुण्याकडले नाहीत. आपले गावाकडचे मीत्र. गांधी हत्येनंतरही गावातंच राहिलेले. आपल्या सारखच मराठवाडी दख्खन्नीत बोलणारे, दिसयलाबी गव्हाळ सावळे. हालाखी कधीकधी शाखा -भाजपची लाईन असती गड्यांची. पण मी फुले आंबेडकर सांगू लागलो की बिचारे तानात येऊन जातेत. वातावरण तंग होतंय. तितक्यात ब्रिग्रेडचा दोस्त आला की विषयच थांबायचा. पण दोस्तान्यात सब माफ. आपल्या पिढ्यांनी केलेला अत्याचार त्यांना कबुलच अन् प्रीव्हीलेजही. पण घरातले संस्कार आणि बाहेर दोस्तांचा रेटा, बिचारा कुढायचा आतमधी. मग आमी मोक्कार सामाजिक विषय काढणं बंद करायचोत. असं प्रत्येका सोबत घडलं असेल. प्रत्येकाचा एक बामण रूममेट असतो. त्याला आपण सॉफ्ट टारगेट करत असतो. नंतर मग ‘दारू वाजता’ सगळं विसरून जातो. असो.

इतर महत्वाचे –

खुप आधी स्थलांतरीत झालेले ब्राम्हणं, शैक्षणीक-सांस्कृतिक सत्ता असलेले ब्राम्हणं त्यांच्या पिढ्या न् पिढ्या सुधरल्या. विदेशात गेले. संगीत,नाटक, शिक्षण, विज्ञान,प्रशासन सगळीकडे दबदबा ठेवला आणि काही प्रमाणात ब्राम्हण्यही ठेवलं. अर्थात ते सगळ्याच जातीत वेगवेगळ्या रूपात ब्राम्हण्य अस्तय म्हणा. आता मला या उत्कर्ष झालेल्या ब्राम्हणांविषयी घेणंदेणं नाहीये. ते तसेबी आपल्याला जवळ करत नाहीत. आपला विषय वेगळाये, जे ब्राम्हणं गाव निमशहरात राहिली. शेतीवाडी नसलेली गरीब सुदाम्या टाईप स्वभाव असलेली. आपल्या सोबत मावा खायला टपरीवर येणारी, पुण्यात वट नसणारी, ज्यांना आपण ‘ऐ.. बामण्या’ म्हणून दोस्तीत पुकारतो किंवा ‘पंत’ आणि ‘देवबप्पा’ असे विशेषण लावतो, जे अभ्यासात हुशार नसल्यामुळे आपल्या सोबतच राहिले, त्यांचा विषय लय खोलंय. ह्या बामण पोरांचे लग्नच जमनात राजेहो. एकतर बामण पोरी हुशार असतात, चांगले करिअर करतात. संगीत वैग्रे असेल तर गावखेड्यात काही खरं नाही. म्हणून परत शहरात. चागलं करिअरवाल्या पोरी कशाला देवबप्पा आणि बिगर इंजैनर-डॉक्टरवाल्या संग लगीन करतील? वयाच्या पस्तशीपस्तोर ही आपली देवबप्पा मंडळी गोसायासारखी मोक्कार फिरायली. बरं आंतरजातीयचा हिकडं इषयचं नाही.

तर एकंदरीत असे की, कोणत्याही समाजाचे प्रश्न असे एकस्तरीय वैग्रे नसतात. (आता ही ओळ मी उगा ग्यान दाखवण्यासाठी लिहली आहे) मुद्दा असा आहे की, ब्राम्हण मोर्चा आणि त्यानंतर चाललेली टिंगल टवाळी बघून मला थोडेसे आत्मपरिक्षण करत असताना आपले कैक जिगरी दोस्तांचे चेहरे दिसले, जे की ‘ब्राम्हण होते’ असे आठवावे लागते. भावायहो, तुमचे लग्न लवकर जमोत.
सदरील लेखामागे ग्यान देण्याचा हेतू नसून निव्वळ थर्ड अँगल सांगण्याचा हेतू आहे. राग लोभ नसावा.

n

कुणाल गायकवाड

Mob. no. – 9284268904
[email protected]

इतर महत्वाचे –

Leave a Comment