शेतकरी आत्महत्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यास सर्वच सरकारांना अपयश आलं, ही वस्तुस्थिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शेतकरी आत्महत्याच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याची धक्कादायक माहिती
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातून समोर आली आहे. गेल्या वर्षभरात १० हजार ८८१ शेतकरी, शेतमजुरांनी आत्महत्या केली असून महाराष्ट्र शेतकरी आत्महत्येच्या आकडेवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी परखड मत व्यक्त करत शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी एकत्रित पणे येऊन पाऊले उचलली पाहिजेत अस म्हंटल आहे.

देशात शेतकरी आणि शेतमजुरांच्या सर्वाधिक आत्महत्या या महाराष्ट्रात झाल्याची NCRB ची आकडेवारी हादरवणारी आहे. हे दुष्टचक्र वर्षानुवर्षे सुरु असून महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला शोभणारं नाही. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यास सर्वच सरकारांना अपयश आलं, ही वस्तुस्थिती आहे. या विषयाकडे राजकारणापलिकडे जाऊन बघण्याची गरज आहे अस मत रोहित पवार यांनी व्यक्त केल.

त्यासाठी सरकार, विरोधी पक्ष, तज्ज्ञ मंडळी आणि सामाजिक संस्था यांनी एकत्रित येऊन एक ठोस कार्यक्रम आखून तो राबवण्याची आणि आपल्या अन्नदात्याच्या गळ्यातील फास काढण्याची गरज आहे. त्यामुळं माझी सरकारला विनंती आहे की, यावर तातडीने पुढाकार घ्यावा आणि विरोधी पक्षानेही सकारात्मक प्रतिसाद देत शेतकरी आत्महत्येचा राज्यावर लागलेल्या डाग पुसून काढण्यासाठी मदत करावी.” अशी मागणी देखील रोहित पवारांनी केली आहे.