सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत 12 वर्षे केला झोपेच्या समस्येचा सामना, सामन्याआधीच्या रात्री असे काहीतरी घडत असे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । क्रीडा क्षेत्रामध्ये मानसिक आरोग्य हा एक महत्वाचा मुद्दा म्हणून उदयास आला आहे. आता क्रिकेटपासून टेनिसपर्यंतचे खेळाडू त्यांचा ताण आणि दबावावर चर्चा करत आहेत. अलीकडेच टेनिस स्टार नाओमी ओसाकाने डिप्रेशनचा हवाला देत फ्रेंच ओपनमधून माघार घेतली होती तर अमेरिकन जिम्नॅस्ट सिमोन बायल्सने टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्याची अंतिम लढत वगळली. त्याच वेळी, भारत-इंग्लंड कसोटी मालिकेच्या अगदी आधी, इंग्लंडचा स्फोटक अष्टपैलू बेन स्टोक्सनेही मानसिक आरोग्याला प्राधान्य देत विश्रांती घेतली. महान फलंदाज सचिन तेंडुलकरलाही आपल्या 24 वर्षांच्या कारकिर्दीत तणावाचा सामना करावा लागला आहे. सचिनला कारकिर्दीत अनेक वर्षे तणावामुळे नीट झोपताही आलेले नाही.

द इंडियन एक्स्प्रेसशी केलेल्या संभाषणात मास्टर ब्लास्टरने सामन्याच्या आदल्या रात्री तो काय करायचा आणि त्याने ही परिस्थिती कशी हाताळली याबाबत सांगितले. आपले जुने दिवस आठवत सचिन म्हणाला कि,”जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची काळजी वाटत असेल तर नक्कीच काही अस्वस्थता दिसून येईल. हे फक्त याचमुळे व्हायचे की, मला माझ्या खेळाची काळजी असायची आणि प्रत्येक वेळी जेव्हा मी बाहेर जायचो तेव्हा मला चांगले काहीतरी करायचे असायचे. माझ्या कारकिर्दीच्या पहिल्या 12 वर्षांमध्ये, मला सामन्यापूर्वीच्या रात्री नीट झोपही लागायची नाही. ”

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके करणारा एकमेव फलंदाज असलेला सचिन पुढे म्हणाला, “मी सतत गोलंदाजांना कसे सामोरे जावे याचा विचार करत असे. ते कशी गोलंदाजी करतील, त्यासाठी माझ्याकडे काय पर्याय आहेत? मी माझ्या झोपेबरोबर विचार करत राहिलो आणि लढत राहिलो. मी नंतर ते हाताळू शकलो. एका दशकानंतर मला समजले की, कदाचित मी सामन्यांसाठी अशीच तयारी करतो. मी त्या परिस्थितीशी लढणे बंद केले. मी सामन्यापूर्वी टीव्ही बघायचो. त्यानंतर मला सामन्यात चांगली कामगिरी करण्यास मदत करणाऱ्या सर्व गोष्टी मी करत असे. मी स्वतःला जितके जास्त समजून घेण्यास सुरवात केली, तितक्या गोष्टी चांगल्या होत गेल्या. मी पूर्णपणे ठीक आहे असे म्हणणार नाही, पण मला माहित होते की, ते नॉर्मल आहे. मी मानसिकदृष्ट्या शांत राहण्याचा प्रयत्न करायचो आणि दुसऱ्या दिवशी मी कसा खेळणार याचा विचार करायचो नाही.

हे संपूर्ण कारकिर्दीत घडले का? या प्रश्नाला उत्तर देताना सचिन म्हणाला, “होय, माझ्या संपूर्ण असे कारकिर्दीत घडले. माझ्या शेवटच्या कसोटीपर्यंत असे घडले. जेव्हा शेवटच्या कसोटीत बाद झालो, तेव्हा संध्याकाळी मी माझ्या भावाशी चर्चा केली. मला माहित नाही की, आम्ही त्यावर चर्चा का केली, कारण जर आम्ही चांगली गोलंदाजी केली तर आम्हाला दुसऱ्यांदा फलंदाजी करण्याची संधी मिळाली नसती. ” सचिनने आपली शेवटची कसोटी नोव्हेंबर 2013 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध मुंबईत खेळली होती. सचिनने या सामन्यात 74 धावांची खेळी खेळली. भारताने हा सामना एक डाव आणि 126 धावांनी जिंकला.

Leave a Comment