जातीपातीच्या विषारी राजकारणाला जनतेने उधळून लावले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे
सांगली जिल्ह्यासारख्या सुसंस्कृत जिल्ह्यात जातीपातीचे राजकारण उभा करुन जो विषारी प्रयत्न झाला त्याला जनतेने उधळून लावले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचा हा विजय असल्याची प्रतिक्रिया खा.संजयकाका पाटील यांनी व्यक्त केली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे मातब्बर पुढारी एकत्र झाले होते मात्र सामान्य जनता माझ्या बाजुने उभी राहिली. पाणी योजनांचे काम, सुरु होत असलेले हायवे, माझा व्यक्तीगत मोठा जनसंपर्क यामुळे जनतेने मोठ्या प्रमाणात मताधिक्य दिले. चुकीच्या पध्दतीने राजकारण करुन स्वत:चे साधून घेणार्‍या प्रवृत्तीने अखेरची धडपड केली. पण सूज्ञ जनतेने हा डाव उधळून लावला. या प्रवृत्तीचा समाचार घेण्यासाठी यापुढे बोट वाकडे करावे लागले तरी हरकत नाही, असा इशाराही खा.संजयकाका पाटील यांनी दिला. यापुढे सिंचन योजना गतीने पूर्ण करणे तसेच ठिबक सिंचनची अंमलबजावणी आपण करु, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

Leave a Comment