प्रिय मोदीजी, “आपल्याच कालच्या आवाहनामुळे लोकांमध्ये गंभीरता संपली, आता चिंता व्यक्त करून काय फायदा” – संजय राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कालच्या जनता कर्फु वर लोकांनी केलेली हुल्लडबाजी आणि आज पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केलेल्या चिंतेला जोरदार टीका करत उत्तर दिले आहे.

राऊत म्हणतात, “आमच्या पंतप्रधान यांना चिंता आहे की, लोक अजूनही ‘लॉकडाउन’ गांभीर्याने घेत नाहीत.  प्रिय मोदीजी, तुम्ही भीती आणि काळजीच्या वातावरणात उत्सवा सारखी परिस्थिती निर्माण केली असेल तर हे असेच होईल.  जर सरकार गंभीर असेल तर जनता गंभीर असेल. जय हिंद जय महाराष्ट्र!. “

पंतप्रधान मोदी यांनी 22 मार्च रोजीसंध्याकाळी जनता कर्फु दरम्यान लोकांना आपत्कालीन सेवा कर्मचाऱ्यांचे आभार टाळ्या , थाळ्या व घंटी वाजवून करण्यास सांगितले होते. मात्र देशात यावेळी लोक घरा बाहेर पडून उत्सव स्वरूपात आभार प्रदर्शन व्यक्त करू लागले. यामुळे गर्दी टाळा या ऐवजी लोकांनी एकत्र येऊन ही वेळ अनेक ठिकाणी साजरी केली.

यावर शिवसेना खासदार यांनी मोदी यांच्या आवाहनाला आणि आजच्या त्यांच्या “लोक अजून गंभीर नाहीत” या ट्विट ला जोरदार उत्तर दिले आहे.

ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

हे पण वाचा –

स्वत:ला वाचवा, स्वत:च्या कुटुंबाला वाचवा! – पंतप्रधान मोदी

मुंबईसाठी धोक्याची घंटा! १२ तासात सापडले कोरोनाचे १० नवीन रुग्ण

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ८९ वर, काल संध्याकाळ पासून १५ रुग्न वाढले

महाराष्ट्र ‘लॉकडाऊन’ करणाऱ्या कलम १४४ मध्ये नक्की असं आहे तरी काय? घ्या जाणून

अबब! कोरोनाच्या चाचणीसाठी मोजावे लागणार तब्बल ४५०० रुपये, शासनाचे निर्देश

धक्कादायक..!! औरंगाबादमध्ये जनता कर्फ्युदिनीच पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचं शाही लग्न

 

Leave a Comment