पोटातील मळमळ ओठावर आली; संजय राऊतांचा चंद्रकांतदादांना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अक्षरशः मनावर दगड ठेऊन एकनाथ शिंदे याना मुख्यमंत्री केलं असं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या कार्यकारणी बैठकीत केल्याने राजकीय खळबळ उडाली. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत याना विचारलं असता जे पोटात मळमळत होतं. ते ओठावर आलं असं म्हणत त्यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, चंद्रकांत पाटील भाजपचे सच्चे कार्यकर्ते आहेत. भाजपमध्ये मनमोकळे बनणे बोलता येत नाही तरीही चंद्रकांत पाटील हे बोलले याबाबत मी त्यांचे अभिनंदन करतो. जे त्यांच्या पोटात मळमळत होतं, ते ओठावर आलं. ही भाजपाच्या कार्यकर्त्यांची भावना आहे, असा खुलासाही त्यांना करावा लागला. ही भाजपची भावना आहे तर त्या भावनेचा आदर व्हायला हवा होता, असं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही चंद्रकांत पाटलांच्या या विधानानंतर जोरदार टोला लगावला होता. छातीवर दगड ठेवायचा की डोक्यावर दगड ठेवायचा त्याच आम्हाला काय त्याचं? त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे असा चिमटा त्यांनी काढला. तसेच संपूर्ण सत्ता केंद्रीत करुन ठेवत दोघांनी सरकार चालवायचं ठरवल्याचं दिसतंय. त्याला त्यांच्या राज्यातील सहकाऱ्यांची आणि केंद्रातील नेतृत्वाची साथ आहे.असं म्हणत त्यांनी फडणविस आणि शिंदे यांच्यावरही निशाणा साधला.

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते-

पनवेलमधील भाजपच्या प्रदेश कार्यकरणीच्या बैठकीत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, केंद्रातील नेत्यांनी आदेश दिला आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले. मनावर दगड ठेवून आपण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले, त्यावेळी आपल्या सर्वांना दुःख झाले. ते दु:ख पचवून पुढे गेलो कारण आपल्याला राज्याचा गाडा पुढे हाकायचा होता. चंद्रकांत पाटील यांच्या विधानानंतर शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहावं लागेल.

Leave a Comment