राणे तुम्ही पुढच्या पिढीला विद्वेषाचं बाळकडू देणार आहे का?; शिवसेना नेत्याचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॅबिनेटमंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. त्यांनी त्यांच्याकडून ठाकरे कुटुंबाबद्दल टीकास्त्र डागले जात आहे. तसेच कोरोनाचे नियम पायदळी तुडवून जन आशीर्वाद यात्रा काढली जात आहे. यावरून शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत राणेंना इशारा दिला. “नारायण राणे मंत्रिपदाचा दुरुपयोग करत आहात. तुम्ही पुढच्या पिढीला विद्वेषाचं बाळकडू देणार आहे का? असा सवाल केसरकरांनी विचारला आहे.

शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी पत्रकार परषद घेत मंत्री राणेंवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, राणे आपल्या मंत्रिपदाचा उपयोग समाजात अशांती आणि विध्वंस पसरवण्यासाठी करतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळात संधी दिली, मंत्रिपद दिलं ते लोकांच्या सेवेसाठी, त्यांच्या विकासासाठी मात्र, ते न करता राणे सामाजिक अशांतता निर्माण करण्याचे काम राणे करीत आहेत.

राणी केलेल्या कुंडलीच्या वक्तव्याचाही यावेळी केसरकर यांनी समाचार घेतला. “राणेंनी पुन्हा पुन्हा कुंडलीची भाषा करु नये. राणे जे बोलतात ती महाराष्ट्राची संस्कृती नाही. राणेंनी कुंडली काढण्याची भाषा करु नये ते ज्योतिषाचे काम आहे. आमच्याकडेही कुंडल्या आहेत. पण हेच करत बसायचं का? असा सवालही केसरकरांनी केला.

Leave a Comment