ते स्वतः वारंवार गरळ ओकत आहेत’; अरविंद सावंतांची भाजपवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाविकास आघाडी सरकारवर भाजपकडून वारंवार घणाघाती टीका केली जात आहे. दरम्यान भाजप नेते तट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केल्यानंतर आघाडीतील नेत्यांकडूनही त्याला प्रत्युत्तर दिले जात आहे. दरम्यान शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भाजपवर टीका केली. महाविकास आघाडीचे सरकार दोन दिवसांत पडेल, असे ही मंडळी पहिल्यापासून म्हणत आहेत. अनेकांना पोटदुखी झाली आहे. ज्यांच्या पोटात मळमळ आहे ते स्वतः गरळ ओकत आहेत,” असे सावंत यांनी म्हंटले आहे.

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आमचे आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेकांना पोटदुखी झाली आहे. आमच्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमचे हिंदुत्व कोणते आहे हे सांगितले आहे. मात्र, ज्यांच्या पोटात मळमळ आहे ते स्वतः गरळ ओकत आहेत. होळीच्या होळकरांना ना देशाचे, ना राज्याचे महत्त्व आहे

गेली दोन वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत देखील मुख्यमंत्र्यानी सांगितल्या प्रमाणेच बोलत आहेत. मात्र, भागवत यांनी आपल्याच माणसाला समजवता येत नसेल तर ते इतरांना काय समजणार. जे लोक शिवसेना पक्षातून बाहेर पडलेत त्यांना बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षातून काढले आहे हि गोष्ट पहिल्यांदा सर्वानी लक्षात घ्यावी.

Leave a Comment