बंद मोडून काढण्याची भाषा करणारे मूर्ख ; संजय राऊतांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्यावतीने आज ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. या बंदमध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाली आहे. याबाबात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. “बंद मोडून काढण्याची भाषा करणारे मूर्ख आहे. देशातील शेतकऱ्यांची लढाई महारासहत्र लढतो आहे, असे राऊत यांनी म्हंटले आहे.

महाराष्ट्र बंदबाबत आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्र हा देशातील शेतकऱ्याची लढाई हा महाराष्ट्र लढतो आहे. आम्ही पुकारलेला बंद हा शंभर टक्के यशस्वी होणारच आहे. सरकारविरोधी आवाज उठवणाऱ्या, न्यायासाठी झगडणाऱ्या, देशासाठी बलिदान देणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आजचा ‘महाराष्ट्र बंद’ पुकारण्यात आलेला आहे.

यावेळी राऊतांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. आज काही जो महाराष्ट्र बंद पुकारण्यात आलेला आहे. त्याला काहींकडून विरोध करण्यात आलेला आहे. मात्र, त्यांनी लक्षात घ्यावे कि आम्ही या बंद मधून कोणत्याही स्वरूपाचे राजकारण करीत नाही लखीमपूरच्या घटनेचा निषेध करीत शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी हा बंद करीत आहोत. मात्र, काहींकडून या बंदला मोडून काढण्याची भाषा करीत आहेत. ते मूर्ख आहेत. विरोधाचे किडे वळवळत असतात, हा शेतकऱ्यांसाठी बंद आहे, शेतकऱ्याने पिकवले नाही तर जे बस गाड्या काढा म्हणत आहेत, ते उपाशी मरतील. मात्र, त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की शेतकऱ्यांच्या पाठिशी महाराष्ट्र उभा आहे.

Leave a Comment