शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची?? निवडणूक आयोग म्हणते….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या सह 40 आमदारांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर राज्यात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. राज्यातील सरकार कोसळून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर खरी शिवसेना आमचीच असा दावा दोघांकडूनही केला जाऊ लागला त्यामुळे हे प्रकरण सध्या केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत गेलं आहे.

केंद्रीय निवडणुक आयोगाने दोन्ही गटांना आपली कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ऑगस्ट महिन्याच्या आठ तारखेपर्यंत दुपारी एकवाजेपर्यंत कागदपत्रे जमा करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग याबाबत निर्णय घेणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता या दोन्ही गटाच्या आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे राज्याच्या राजकारणाचं लक्ष लागून असणार आहे.

दरम्यान, शिंदे यांच्या बंडखोरी नंतर आदित्य ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात शिवसंवाद यात्रा काढली आहे. बंडखोर आमदारांवर अत्यंत कठोर शब्दांत ते टीका करत असून आगामी काळात शिवसेना विरुद्ध शिंदे गट हा वाद आणखी विकोपाला जाण्याची शक्यता आहे.

Leave a Comment