ठाणे : पाणी प्रश्नावरून दोन महिला नगरसेवकांत मारणारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ठाणे प्रतिनिधी | शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांच्या कार्यालया बाहेर शिवसेनेच्या दोन नगरसेवकांची मारामारी झाल्याची घटना समोर आली आहे. पाऊस जसा लांबत जाईल तसा शहरातील पाणी प्रश्न देखील बिकट बनत जाईल त्यामुळे असे वाद रोज नव्याने उदभवण्याची शक्यता आहे.

विजयसिंहांना मंत्रिपद नाही तर ‘हे’ पद दिले जाणार

नगरसेविका प्रेमा म्हात्रे आणि आशालता बाबर यांच्यात सुरुवातीला बाचाबाची झाली. पण नंतर प्रेमा म्हात्रे यांनी माझ्या कानशिलात लगावली, असा आरोप नगरसेविका आशालता बाबर यांनी केला आहे. याबाबत त्यांनी पोलीस स्थानकात तक्रारही दाखल केली आहे.

रणजितसिंह मोहिते पाटलांना मंत्रीपद!

मारहाण केल्याबाबत आशालता बाबर यांच्याकडून तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर प्रेमा म्हात्रे यांनी या प्रकरणाबाबत खुलासा केला आहे. ‘मी बाबर यांना मारहाण केलीच नाही,’ असा दावा प्रेमा म्हात्रे यांनी केला आहे. आशालता बाबर माझ्यावर खोटा आरोप करत आहेत, असंही म्हात्रे यांचं म्हणणं आहे.

Leave a Comment