फडणवीस जेव्हा सरकार पाडतील तेव्हा आम्ही त्यांचं अभिनंदन करु; राऊतांचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान ठाकरे सरकार अस्थिर करण्याबाबत वक्तव्य केलं होतं. सरकार कधी पाडायचं ते माझ्यावर सोडा असा इशारा फडणवीसांनी ठाकरे सरकारला दिला होता. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत फडणवीसांना टोला लगावला आहे. फडणवीस जेव्हा सरकार पाडतील तेव्हा आम्ही त्यांचं अभिनंदन करु”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

संजय राऊत म्हणाले, विठोबा माऊलीचा आशीर्वाद महाविकास आघाडी सरकारला आहे. आज जनता कोरोना संकटात सापडली आहे. या काळात सरकार पाडणं, सरकार घालवणं, सरकार अस्थिर करणं या सगळ्यातून बाहेर आलं पाहिजे”, असं मत संजय राऊत यांनी मांडलं.

देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांना लोकांमध्ये विश्वास आणण्यासाठी किंवा त्यांचे आमदार एकत्र ठेवण्यासाठी अशा प्रकारची भाषणं करावी लागतात. अशा प्रकारची भाषण आम्हीसुद्धा केली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील केली आहेत. राजकारणात अशा भाषणांना जेवढं महत्त्व द्यायचं ते तेवढंच द्यायचं. फडणवीस जेव्हा सरकार पाडतील तेव्हा आम्ही त्यांचं अभिनंदन करु”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment