पश्चिम बंगालच्या जनतेने भाजपला त्यांची जागा दाखवली – संजय राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीचा निकाल हा लोकशाहीचा विजय आहे. पश्चिम बंगालचा निकाल हा देशाला दिशा देणारा निकाल असून पश्चिम बंगालच्या जनतेने भाजपला त्यांची जागा दाखवली बंगालची जखमी वाघीण लढली आणि जिंकलीही अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ममता बॅनर्जीच्या विजयावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र यांचं भावनात्मक नात आहे. पश्चिम बंगालच्या जनतेने भाजपला त्यांची जागा दाखवली. देशावर कोरोनाचे संकट असताना देखील देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी लाखोंच्या सभा घेतल्या. राज्याच्या निवडणूकीसाठी किंवा एका स्त्रीचा पराभव करण्यासाठी पंतप्रधान तळ ठोकून बसतात आता त्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारावी असेही राऊत म्हणाले.

दरम्यान यावेळी त्यांनी पंढरपूर पोटनिवडणुकीच्या निकालावर देखील भाष्य केले. पंढरपूरच्या निवडणूकीत महाविकास आघाडी कमी पडली हे त्यांनी मान्य केलं. पण पंढरपूरचा निकाल हा काही महाराष्ट्रातील सरकार बदलणार नाही असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. भाजप कडून सतत करण्यात येणारे करेक्ट कार्यक्रमचे दावे ही फक्त हवा आहे असेही संजय राऊत म्हणाली.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment