मोदी सरकारचं करोनाशी दोन हात करण्याचं धोरण काय; सोनिया गांधी यांचा प्रश्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । १७ मे रोजी लॉकडाउन ३ ची मुदत संपणार आहे. त्यानंतर मोदी सरकारचं करोनाशी दोन हात करण्याचं धोरण काय आहे असा प्रश्न सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला आहे. सोनिया गांधी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत मोदींशी चर्चा केली. तेव्हा त्यांनी अनेक प्रश्न विचारले आहेत.

या बैठकीत खासदार राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचा ही सहभाग होता. लॉकडाउन ३ नंतर म्हणजेच १७ मेनंतर मोदी सरकार काय निर्णय घेणार ? लॉकडाउनसाठीचे नेमके काय निकष १७ मेनंतर असतील असेही प्रश्न सोनिया गांधी यांनी विचारले आहेत.

लॉकडाउनचा कालावाधी १७ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. या सगळ्या दिवसांमध्ये काँग्रेस शासित राज्यांची स्थिती नेमकी काय आहे? तिथे करोनाचे रुग्ण किती आहेत? काय काय उपाय योजण्यात आले आहेत. याबाबत आज सोनिया गांधी यांनी काँग्रेस शासित राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. त्यावेळी त्यांनी हे प्रश्न उपस्थित केले.

Leave a Comment